Sunday, October 28, 2012

न मी कोणाचा न कोण माझं ?

विचार करतो मी आहे तरी कोण
शिकल्याची ओळख कि शिकल्याचा शिक्का ?
विचारसरणी कि मांडलिकत्व ?
काय माहीत ? शोधण्याच्या प्रयत्नात भुणभुणतोय भुंगा
वृषभचिन्हांकित मुद्रेसारखा मी स्तब्ध
मनात भयाणतेच्या फेसाळणार्याम लाटा
लालभाईला ठोकलेला लाल सलाम
वर्गव्यवस्थेवर उगारलेला रोकडा संतप्त राग
मला कम्यूनिस्टांचा कॉम्रेड करून गेला.
मग सुरू झाल्या निरंतर प्रसवणार्या कर्कमादिसमक्ष चर्चा,
खांद्यावरचा झोला सावरत कुर्त्याच्या खिशातून काढलेली सिगरेट शिलगावत
क्रांती, शोषण वगैरे वगैरे विषयांवर बुड खाजेस्तोवर चर्चा,
कालांतराने पुढचा रस्ता धरला,
पुढचा सोबती भेटला,
आडनाव काढलंय म्हणून नाव ऐकताक्षणी त्याने मला समाजवादी असल्याचं
अनवॉंटेड सर्टिफिकेट बहाल केलं होतं,
नेहमी मला तो त्यांच्या गोतावळ्यातलाच समजायचा,
पण चुकून कधी त्याच्या घराचा पत्ता माझ्या डोळ्याला शिवला नव्हता.
शाळेत आडनाव सांगायचो तेव्हा म्हणायचे नाशिकचा का ? की खांदेशातला ?
फरक कळत नव्हता ?
रंग काळा, आडदांड शरीर म्हणायचे तु खांदेशातलाच.
आता मी मोठा झालो,
कॉलेजात गेलो, कधी नव्हे ते गोत्र विचारलं
झाटा कळालं नाही,
मी तसाच स्तब्ध, पण डोकं भन्नावलेलं,
डिग्री मिळाली, सामाजिक आयुष्याची सुरूवात झाली,
वळवळ्यांबरोबर चळवळीचे कित्ते गिरवले,
पण येथेही आला आयडेंटीटी क्रायसीस !
मी संविधानवर असतो तेव्हा आठवले गटाचा,
वडाळ्यात नुसता गेलो तरी भाईचा माणूस,
कधी कवाडे सरांच्या तरी कधी भारीप बहुजन महासंघाचा,
ओळखी अनेक मिळाल्या, अनेकदा न मागता,
ह्यांनी दिलेल्या ओळखी, शिक्के, आयडेटिच्या सर्टिफिकेटने
साधा बोचा पुसता येणार नाही, हे ही पुरपुर ठावूक होतं,
मी प्रत्येक कंपूत जबरदस्ती घुसवला गेलो आणि तसाच बाहेरही
एकच ओळख सांगायचो मी आंबेडकरवादी आहे
तेव्हा मात्र विचार नाही तर जात दिसायची
मग मात्र मी कम्यूनिस्ट नाही ना समाजवादी नाही मराठी,
नाही अन्य कोणी, कारण तेव्हा
अधोरेखित झालेलं असतं ते माझं महारपण..
तदपासून न मी कोणाचा न कोण माझं ?

Wednesday, April 25, 2012

दलितपणाला डिलीट करा..


कोणत्याही प्रॉडक्टचे यश त्याच्या ब्रँडिंगवर अवलंबून असते. सध्या दलितपणाचे जोरदार ब्रँडिग सुरू आहे. देशातील ६००० हून अधिक जातींना संबोधण्यासाठी दलित हा तसा सोयीचा शब्द. आज पहावे तेथे दलितत्वाचे उदात्तीकरण फार वेगाने चालू आहे. त्यामुळे आंबेडकरी असो किंवा बौद्ध त्यांचे दलितिकरण करण्याची एक छुपी प्रोसेस हळूहळू पकड घेताना दिसत आहे. त्यामुळे मनूला आणि त्याच्या जातींना दलित ह्या ब्रँडखाली पूनर्जीवीत करण्याचं काम परत सुरू झालं. दलित ह्या संकल्पनेचा उगमच मुळात जातीनिहाय व्यवस्थेला दर्शविण्यासाठी केला गेला आहे. हल्ली स्वतःला अभिमानाने दलित म्हणवून घेण्याचा जो प्रघात सुरू आहे तो निश्चितच जातीव्यवस्था पुन्हा सदृढ करणारा आहे. जोपर्यंत जातींचे अस्तित्वच नष्ट होत नाही तोपर्यंत जातीय आत्याचार संपणार नाहीत. म्हणून आज आंबेडकरी तरुणांचा एक मोठा वर्ग दलितत्वाला डिलीट करण्याची भाषा करत आहे. त्यानिमित्ताने.. 

दलित हा शब्द सर्वप्रथम फुलेंनी पायदळी तुडवले गेलेल्या अस्पृश्यांसाठी वापरला होता. १९३२ साली बाबासाहेबांनी नीचतेचे प्रतिक असणार्‍या दलित संकल्पनेला कडवा विरोध केल्यामुळे तत्कालीन ब्रिटीश प्रशासनाने दलित शब्दाला हद्दपार केले. बाबासाहेबांनी दलितऐवजी कायम अस्पृश्य किंवा ब्रोकन मॅन सारख्या संकल्पना वापरल्या होत्या. हजारो वर्षांपासून चालत आलेली जातीव्यवस्था संपवण्यासाठी धर्मांतरासारखी रक्तहीन क्रांती घडवून आणली आणि या देशातील जातीव्यवस्थेच्या चिंधड्या उडविल्या. परंतू बाबासाहेबांच्या पश्चात दलित संकल्पनेचे पूनर्वसन करण्याचे जोरदार प्रयत्न प३तिगामी संघटनांकडून सुरू झाले. त्यात विद्रोही लेखकांनी दलित शब्दाला कधीच जातीवाचक विशेषण मानले नाही. स्वतःची ओळख विद्रोहाचा यल्गार पुकारणारे लेखक अशी दिली परंतू समाजाची ओळख मात्र दलित समाज म्हणूनच करून देण्याता ते आघाडीवर राहीले. त्यामुळे जवळपास सर्वांनीच दलित संकल्पनेला अघोषित मान्यता दिली. देशाला लोकशाहीची शिकवण देणार्‍या बाबासाहेबांनीच आम्हाला प्रथमतः आणि अंततः एक भारतीय नागरिक बनविले तेव्हा दलित म्हणून ओळख मिरविणे हा बाबासाहेबांच्या विचारांशी केलेला द्रोहच आहे. कारण दलितपण हे मनूवादी व्यवस्था न नाकारता बाबासाहेबांना सोयीनुसार वापरून पुरोगामी बनण्याची मुभा देते.
        दलित शब्द हवा की नको असा हा शब्दप्रामाण्यवादाचा मुद्दा नसून आत्मभान जागृत झालेल्या स्वाभिमानी समाजाच्या अस्तित्वाचा मुद्दा आहे. बाबासाहेबांच्या विचारांना, पुरोगामी सिद्धांतांना आचरणात आणणारे आज यशाच्या शिखरावर विराजमान आहेत. शतकानुशतके मूक प्राणी बनून जातीय अत्याचार सोसणारा सारा शोषित, पीडीत वर्ग बाबासाहेबांच्या प्रेरणेने व्यक्त होउ लागला. अनेक थोर साहित्यिक, नामांकित कायदेतज्ञ, उद्योगपती, विचारवंत, पत्रकार, अर्थतज्ञ निर्माण झाले. यासाठी त्यांचा उल्लेख हा आंबेडकरी विचारांना मानणारे म्हणूनच व्हायला हवा. परंतू त्यांच्या कार्याला सु्द्धा दलित नावाचं जातीय लेबल लावून अंकुचित केलं गेलं. डॉ. नरेंद्र जाधव किंवा डॉ. मुणगेकरांचा उल्लेख नेहमी दलित इकॉनॉमिस्ट म्हणूनच केला जातो. साहित्यविश्वात विद्रोही लेखकांना आणि त्यांच्या साहित्याला नेहमी दलित साहित्यिक म्हणून त्यांच्या जातींची ओळख देण्यात आली. विजय तेंडुलकरांनी देखील त्यांच्या अनेक साहित्यकृतींतून जातीव्यवस्थेवर आसूड ओढले होते परंतू त्यांच्या लिखाणाला कधी कोणी दलित साहित्य म्हटल्याचे ऐकिवात नाही. अनेक बौद्ध पत्रकारांनी काढलेल्या वृत्तपत्रांना त्यांच्या वृत्तपत्रीय साहित्यिक मूल्यापेक्षा त्यांच्या दलितपणाच्या निकषावरच तपासण्यात आले. मागासवर्गीय तज्ञांनी मांडलेले सिद्धांत काय केवळ मागासवर्गीयांसाठीच असतात की त्यातील शब्द, त्यांचे ज्ञान, त्यांचे निष्कर्ष दलितपणाचे काही विशिष्ट जातीय संस्कार करवून घेतलेली असतात? ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळायलाचे हवे.  
        विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जातीनिहाय अभ्यायक्रम शिकवला जातो का ? मग एखाद्या मागासवर्गीय विद्यार्थ्याने समान व्यवस्थेत संघर्ष करून यश संपादन केल्यावरही त्याने त्या क्षेत्रातील मातब्बर दलित म्हणून जातीवाचक विटंबंना का म्हणून सहन करायची? बाबासाहेबांनी देखील अनेक उत्कृष्ट साहित्य निर्माण केले. अनेक पत्रकं चालवली. त्यांनी मांडलेले सिद्धांत आज संपूर्ण देशाला विकासाच्या मार्गावर घेउन गेले आहेत. मग त्या सिद्धांतांना दलित म्हणायचं? जर ते दलित असते तर त्या सिद्धांतामुळे केवळ ठराविक जातींचाच विकास व्हायला हवा होता ना? दलितपणानेच दलित लेखक, दलित विचारवंत, दलित उद्योजक, दलित वकिल, दलित कामगार, दलित संघटना, दलित नेते, दलित रंगभूमी सारखे अर्थहीन प्रकार उदयाला आणले. प्रत्येकाला त्याच्या कार्यक्षेत्रानुसार जातीचं लेबल लावून विभागून देणे हा मनूस्मृतीचा संस्कार नाही का ? अस्पृश्यतेचा कायदेशीररित्या बिमोड करणार्‍या भारतीय संविधानाला पण दलित संविधान म्हणायचे का?
दलितपणाला प्रमाण मानणार्‍या बामसेफसारख्या संघटना धर्म मिथ्या, जाती सत्य ह्या सुत्रावरच कार्यरत आहेत. मुलनिवासी संघ सारख्या संघटनांनी मुलनिवासी तत्ववादातून वांशिक आणि जातीय तेढ निर्माण करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. निवडणूकीत प्रत्येक राजकीय पक्षाकडून केले जाणारे दलित व्होट बँकेचे राजकारण हे निरपेक्ष लोकशाहीच्या अधोगतीसाठी कारणीभूत ठरत आहे. स्वतःला दलित म्हणवून घेण्यात धन्यता मानणारे हे बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्धप्रणालीचा नाकारतात. ते फक्त त्यांचे सवतसुभे जपण्यासाठी स्वतःची जातीनिष्ठ सोय करण्यात गुंतले आहेत. आणि म्हणूनच दलितपणातून स्वतःकडे सहानूभूती आकर्षित करणार्‍यांच्या यादीत आंबेडकरी तरूण हा कुठेच फिट बसत नाही.
          कोणत्याही राष्ट्राच्या विकासात सशक्त आणि निरोगी समाजाचे फार मोठे योगदान असते. समाजनिर्मितीत वतर्मान स्थिती आणि आधुनिकता फार मोठी भूमिका बजावतात. भूतकाळातून प्रेरणा घेउन वर्तमान  यशस्वी करता येते. थोडक्यात अस्पृश्यपणाचे प्रतीक कधीच वर्तमानातील प्रगतीचे आधार बनू शकत नाहीत. दलित ही कधीच स्वाभिमानाची बिरूदावली होऊ शकत नाही. किंवा त्याला आलेला प्रतिशब्द देखील ती उणीव भरून काढू शकत नाही. २००८ साली राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दलित हा शब्द असंवैधानिक ठरवला आहे. छत्तीसगडने दलित शब्द रद्दबातल केला आहे. वास्तविकतः कोणत्याही प्रकारचे जातीदर्शक विशेषण हे जातीनिहाय फुटीरतावादाची बीजे पेरतात. आणि जर तसे नसते तर आज हिंदूराष्ट्र किंवा दलितराष्ट्र म्हणण्यापर्यंत येथील फुटिरतावाद्यांची मजल गेली नसती. आमचा ध्यास, प्रेरणा ही सर्व काही आंबेडकर नावाच्या राष्ट्रवादी विचारधारेभोवती आहे. जी आम्हाला एक भारतीय नागरीक म्हणून जगण्यास प्रवृत्त करते. जातीपातीच्या भिंती पाडून समताधिष्ठित विकासाची दृष्टी देते. म्हणूनच आमच्या जाती आणि दलितत्व नाकारतो. एकविसाव्या शतकात जगताना भूतकाळाचे एक्सटेंशन घेउन जगण्यात काहीच अर्थ नाही. म्हणूनच दलित या संकल्पनेला आम्ही आमच्या आयुष्यातून डिलीट करणे गरजचे आहे.  
(वरिल लेख हा कलमनामा १३ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे . )

Thursday, March 29, 2012

THE PROBLEM OF THE RUPEE: IT’S ORIGIN AND ITS SOLUTION


FOREWORD OF
THE PROBLEM OF THE RUPEE:  IT’S ORIGIN AND ITS SOLUTION
 BY PROFESSOR EDWIN CANNAN
I am glad that Mr. Ambedkar has given me the opportunity of saying a few words about his book. As he is aware, I disagree with a good deal of his criticism. In 1893, I was one of the few economists, who believed that the rupee could be kept at a fixed ratio with gold by the method then proposed, and I did not fall away from the faith when some years elapsed without the desired fruit appearing (see Economic Review, July 1898, pp. 400—403). I do not share Mr. Ambedkar hostility to the system, nor accept most of his arguments against it and its advocates. But he hits some nails very squarely on the head, and even when I have thought him quite wrong, I have found a stimulating freshness in his views and reasons. An old teacher like myself learns to tolerate the vagaries of originality, even when they resist severe examination such as that of which Mr. Ambedkar speaks.
In his practical conclusion, I am inclined to think, he is right. The single advantage, offered to a country by the adoption of the gold exchange system instead of the simple gold standard, is that it is cheaper, in the sense of requiring a little less value in the shape of metallic currency than the gold standard. But all that can be saved in this way is a trifling amount, almost infinitesimal, beside the advantage of having a currency more difficult for administrators and legislators to tamper with. The recent experience both of belligerents and neutrals certainly shows that the simple gold standard, as we understood it before the war, is not fool-proof, but it is far nearer being fool-proof and knave-proof than the gold-exchange standard. The percentage of administrators and legislators who understand the gold standard is painfully small, but it is and is likely to remain ten or twenty times as great as the percentage which understands the gold-exchange system.
The possibility of a gold-exchange system being perverted to suit some corrupt purpose is very considerably greater than the possibility of the simple gold standard being so perverted. The plan for the adoption of which Mr. Ambedkar pleads, namely that all further enlargement of the rupee issue should be permanently prohibited, and that the mints should be open at a fixed price to importers or other sellers of gold, so that in course of time India would have, in addition to the fixed stock of rupees, a currency of meltable and exportable gold coins, follows European precedents. In eighteenth century England the gold standard introduced itself because the legislature allowed the ratio to remain unfavorable to the coinage of silver: in nineteenth-century France and other countries it came in because the legislatures definitely closed the mints to silver, when the ratio was favorable to the coinage of silver. The continuance of a mass of full legal tender silver coins beside the gold would be nothing novel in principle, as the same thing, though on a somewhat smaller scale, took place in France, Germany, and the United States. It is alleged sometimes that India does not want gold coins. I feel considerable difficulty in believing that gold coins of suitable size would not be convenient in a country with the climate and other circumstances of India.
The allegation is suspiciously like the old allegation that the Englishman prefers gold coins to paper, which had no other foundation than the fact that the law prohibited the issue of notes for less than £ 5 in England and Wales, while in Scotland, Ireland, and almost all other English-speaking countries, notes for £ 1 or Less were allowed and circulated freely. It seems much more likely that silver owes its position in India to the decision, which the Company made before the system of standard gold and token silver was accidentally evolved in 1816 in England, and long before it was understood, and that the position has been maintained, not because Indians dislike gold, but because Europeans like it so well that they cannot bear to part with any of it.
            This reluctance to allow gold to go to the East is not only despicable from an ethical point of view. It is also contrary to the economic interest not only of the world at large, but even of the countries, which had a gold standard before the war and have it still or expect soon to restore it. In the immediate future, gold is not a commodity, the use of which it is desirable for these countries either to restrict or to economize. From the closing years of last century it has been produced in quantities much too large to enable it to retain its purchasing power and thus be a stable standard of value, unless it can constantly be finding existing holders willing to hold larger stocks, or fresh holders to hold new stocks of it. Before the war, the accumulation of hoards by various central banks in Europe took off a large part of the new supplies and prevented the actual rise of general prices being anything like what it would otherwise have been, though it was serious enough. Since the war, the Federal Reserve Board, supported by all Americans who do not wish to see a rise of prices, has taken on the new White Man's Burden of absorbing the products of the gold mines, but just as the United States failed to keep up the value of silver by purchasing it, so she will eventually fail to keep up the value of gold. In spite of the opinion of some high authorities, it is not at all likely that a renewed demand for gold reserves by the central banks of Europe will come to her assistance. Experience must gradually be teaching even the densest of financiers that the value of paper currencies is not kept up by stories of cover or backing locked up in cellars, but by due limitation of the supply of the paper. With proper limitation, enforced by absolute convertibility into gold coin which may be freely melted or exported, it has been proved by theory and experiences those small holdings of gold are perfectly sufficient to meet all internal and international demands.
There is really more chance of a great demand from individuals than from the banks. It is conceivable that the people of some of the countries, which have reduced their paper currency to a laughing stock, may refuse all paper and insist on having gold coins. But it seems more probable that they will be pleased enough to get better paper than they have recently been accustomed to, and will not ask for hard coin with sufficient insistence to get it. On the whole, it seems fairly certain that the demand of Europe and European-colonised lands for gold will be less rather than greater than before the war, and that it will increase very slowly or not at all.
Thus, on the whole, there is reason to fear a fall in the value of gold and a rise of general prices rather than the contrary.  One obvious remedy would be to restrict the production of gold by international agreement, thus conserving the world's resources in mineral for future generations. Another is to set up an international commission to issue an international paper currency so regulated in amount as to preserve an approximately stable value. Excellent suggestions for the professor's classroom, but not, at present at any rate nor probably for some considerable period of time, practical politics.
A much more practical way out of the difficulty is to be found in the introduction of gold currency into the East. If the East will take a large part of the production of gold in the coming years it will tide us over the period which must elapse before the most prolific of the existing sources are worked out. After that we may be able to carry on without change or we may have reached the possibility of some better arrangement.
This argument will not appeal to those who can think of nothing but the extra profits which can be acquired during a rise of prices, but I hope it will to those who have some feeling for the great majority of the population, who suffer from these extra and wholly unearned profits being extracted from them. Stability is best in the long run for the community.
EDWIN  CANNAN
THE PROBLEM OF THE RUPEE:  IT’S ORIGIN AND ITS SOLUTION
(HISTORY OF INDIAN CURRENCY & BANKING)

Saturday, March 24, 2012

LOG-IN -- part 5



शाळेत असताना निबंधात एक विषय हमखास असायचा. सूर्य उगवलाच नाही तर ? आई संपावर गेली तर? बुद्धीच नष्ट झाली तर ? फारसा न हातळला जाणारा हा निबंधप्रकार. पण जर असं म्हटलं की, इंटरनेटच बंद झालं तर? अहो थोडासा विचार तर करून पहा. इंटरनेटविरहीत जगाची कल्पना करणं देखील किती अशक्य कोटीतला विचार आहे ना ! पण खरंच इंटरनेट संपावर जातंय. येत्या ८ मार्च २०१२ ला ते संपावर जाण्याची तयारी करतंय. सध्या डिएनएसचेंजर ट्रोजन या शक्तिशाली व्हायरसने जगभरातील अनेक संगणकप्रणालींवर ताबा मिळवला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेच्या एफबीआय या संस्थेने ८ मार्च रोजी १०० पेक्षा अधिक देशांतील इंटरनेट सेवा बंद करण्याचे सुतोवाच केले असून संपूर्ण सर्व्हर व्हायरसफ्री करण्यासाठी काही कडक पावले उचलणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हटले आहे. संबंध मानवी समाजसमुहाचे आयुष्य सुखमय करणारं आंतरजालावर डिएनएसचेंजर ट्रोजनमुळे ही वेळ ओढावलीये.
आपण आत्तापर्यंत साईन इन ह्या सदरात सोशल नेटवर्किंग साईट्सवर चर्चा करत आलो आहोत. सध्याच्या सार्‍या सोनेसा ह्या इंटरनेटमुळेच आपल्यापर्यंत पोहोचतात. जर इंटरनेट हीच सर्वात विशाल व आद्य सोशल नेटवर्किंग असल्याचे म्हटले तर त्यात काहीही वावगे ठरणार नाही. माणूस ज्या समुहात राहतो त्याठिकाणच्या वास्तविकतेनुसार त्याच्या जाणिवा आणि गरजा निर्माण होत असतात. गरज हीच शोधाची जननी आहे. दळणवळण, संदेशवहनाच्या वेगवान सोयीसुविधांमुळे जगाच्या पाठीवरिल विविध मानवी समुह एकमेकांच्या संपर्कात किंवा नेटवर्कमध्ये बांधले गेले. चौफेर विखूरलेले जग इंटरनेटच्या संपर्क क्रांतीमुळे अगदी जवळ आले. हीच सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग. पण ह्यावर सुद्धा व्हायरसचे ग्रहण लागले आहे. नेमका हा डिएनएसचेंजर ट्रोजन आहे तरी काय हे समजून घेताना त्याच्या दृश्य व अदृश्य परिणामांची चर्चा होणे देखील तितकेच गरजेचे आहे.
डॉटकॉम प्रणाली ही संकेतस्थळाची जन्मदाती. प्रत्येक संकेतस्थळाला स्वतःचे डोमेन म्हणजे नाव-वजा-पत्ता असतो. हे डोमेन-नेम ज्या सर्व्हरमधून वितरीत होते त्या सर्व्हरला निकामी करण्याची करामत डिएनएसचेंजर ट्रोजन करू पाहत आहे. त्यामुळे डोमेन एक आणि आतले कंटेट भलतेच असा विचित्र गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण जर सर्व्हरमध्येच तांत्रिक बिघाड झाला तर संकेतस्थळावर उपलब्ध असणार्‍या माहीतीची कोणत्याही प्रकारे सुरक्षाहमी दिली जाऊ शकणार नाही. यामुळे संपूर्ण जगाला फार मोठ्या आर्थिक व सुरक्षाविषयक संकटांना तोंड द्यावे लागू शकते. सारी बॅंकिंग सिस्टिम, गुप्त दस्तावेज, संपर्कप्रणाली, सारे ब्लॉग्ज, सोशन नेटवर्किंग साईट्स, उपग्रहे, दळवळणाच्या सार्‍या सुविधा ठप्प होतील. एकुणतःच इंटरनेट बंद होणार्‍या त्या १०० देशांतील एकुण कार्यप्रणालीला जबर नुकसान पोहोचेल. ह्या व्हायरसला ८ मार्च पूर्वीच नष्ट करण्यासाठी अनेक तज्ञ प्रयत्नशील आहेत. परंतू एक दिवस जरी इंटरनेट बंद राहीले तर प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचे अतोनात नुकसान होण्याची भीती व्यक्त होतेय. गेल्या वर्षी इजिप्तमध्ये झालेल्या राजकीय क्रांतिच्या काळात इंटरनेट सेवा बंद केली गेली होती. पहिल्या दोन दिवसातच ४१० कोटीं रुपयांचे नुकसान इजिप्तला सोसावे लागले होते.
सदर संकटाला टाळण्यासाठी एफबीआयने गेल्या वर्षीच एका पर्यायी डिएनएस सर्व्हरची उभारणी केली होती. अतिशय गुप्तपणे क्लिनींगची प्रक्रिया सुरू होती. ६ नोव्हेंबर २०११ रोजी डिएनएसचेंजर ट्रोजन वायरस बनविण्याच्या आरोपाखाली अमेरिकेतील एस्टोनिया प्रांतातून सहा जणांना अटक करण्यात आली होती. हा वायरस ज्या सिस्टिममध्ये शिरतो त्या सिस्टिम आणि नेटवर्कला करप्ट करतो. त्यावर नको असलेले सॉफ्टवेअर आपोआप डाउनलोड होत जातात. गंम्मत म्हणजे तुमची सिस्टिम ही वायरस अफेक्टेड आहे ती क्लिन करण्यासाठी इथे क्लिक करा असा संदेश हा वायरस प्रोग्रामकडून कंम्प्यूटर स्क्रिनवर पाठवला जातो. त्याला क्लिक करताक्षणी वायरस संपूर्ण सिस्टिमचा ताबा घेतो.  
आत्तापर्यंत एकट्या अमेरिकेतच साडे पाच लाखांहून अधिक संगणक ट्रोजनला बळी पडले आहेत. एफबीआयने लावलेले पर्यायी सर्व्हर सुद्धा कूचकामी ठरले. फॉर्चून च्या जवळपास तीनशे कंपन्या, जगातील प्रमुख ७० संस्थांपैकी २७ संस्थांचे सर्व्हर्सचे ह्या वायरसमुळे नुकसान झाले आहे. ह्या कंपन्या व संस्थांसाठी वापरले जाणारे सर्व्हर हे एफबीआयच्या डीएनएस सर्व्हरवर काम करतात. कोर्टाने दिलेल्या मुदतीत जर कोणतीही उकल काढली गेली नाही तर इंटरनेट सुविधा बंद होण्याची शक्यता ही १०० %  आहे. एकट्या भारतातच गेल्या डिसेंबर अखेरपर्यंत १२ कोटी इंटरनेट युजर्स असल्याचे आय-क्यूबने जाहीर केले होते. अमेरिकेपाठोपाठ भारत हा इंटरनेट जगतातील क्रमांक दोनची सर्वात मोठी बाजारपेठ असून ह्या व्हायरसचा अमेरिकेनंतर सर्वात जास्त त्रास आपल्यालाच सहन करावा लागेल.
संगणक, आंतरजालप्रणाली ही मानवाने स्वतःच्या उत्कर्षासाठी विकसित केलेली आहे. स्वतः जन्माला घालणार्‍या अनेक नवीन शोधांवर प्रमाणापेक्षा अधिक विसंबून राहण्याची सवय मानवी मनाने सोडायला हवी. यापूर्वी वायटूके या सुपर बग मुळे सारी संपर्कप्रणाली नष्ट होण्याची भीती व्यक्त केली होती. पण ती भीती तज्ञांनी फोल ठरवली. प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये ट्रोजन-हॉर्सला ढाल बनवून अख्खे ट्रॉय शहर उद्धवस्त केले गेले होते. आत्ता हाच डीएनएसचेंजर ट्रोजन नव्या युगातील सायबर वर्ल्डला लगाम घालू पाहतोय. परंतू मानवी मनाच्या व बु्द्धीच्या उच्चतम कौशल्य असलेले इंटरनेट व त्याचे निर्माणकर्ते हे संकट कसे थोपवतात ते पाहणे निश्चितच औत्स्यूक्याचे ठरेल.     

 (पुढील भागासाठी येथे क्लिक करा )
                                             

Friday, March 16, 2012

LOG - IN Part – 4


हॅप्पी बर्थडे टू यू फेसबुक  
जगभर पसरलेल्या नेटीझन्सना इंटरलिंक करत सोशल नेटवर्किंगचे सारे परिप्रेक्ष बदलवून टाकणार्‍या फेसबुकने या ४ फेब्रुवारीला वयाची आठ यशस्वी वर्षे पूर्ण केली. २००४ साली हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थीदशेत असताना मार्क झुकरबर्गने आपले मित्र डस्टीन, ख्रिस हजेस  आणि सॅवेरिन सोबत विद्यापीठातच ही साईट सुरू केली. आजमितीला तब्बल ८५ कोटी युजर्स असणार्‍या फेसबुकने लोकप्रियतेसोबतच व्यापार जगाताची अनेक शिखरे अल्पावधीतच पादक्रांत केली आहेत. चॅटिंग, इ-मेल्स, डाटा शेअरिंग एवढंच काय ते सोनेसाचं कार्यक्षेत्र. पण फेसबुकने वर्चुअल जगाच्या सार्‍या  कक्षाच रुंदावून टाकल्या. जास्मीन रेवोल्यूशन असो किंवा भारतातील अण्णाप्रणित क्रांति.. फेसबुकने मने जोडण्याचे विस्मयकारक कार्य केले आहे. एफबी यूजर्सची संख्या पाहता भविष्यात एफबी एक वर्चुअल राष्ट्र म्हणून घोषित झालं तर तो निश्चितच आश्चर्याचा धक्का नसेल.
हॅकींग एक्पर्ट असणार्‍या मार्क आणि त्याच्या साथीदारांनी २००३ साली हार्वर्ड सर्व्हरमधील रेस्ट्रिक्टेड एरियात हॅकिंग करून नवा कोड तयार केला. हा कोड वेबसाईटवर डेव्हलप करून त्यात अनेक फोटोज अपलोड केले. सुरूवातीला त्याने त्याला फेसमॅश नाव दिले. फेसमॅश सुरू झाल्याच्या अवघ्या चार तासात साडेचारशे व्हिजीटर्स आणि २२,००० इमेजव्हिव्ह्ज आल्या. ही बाब हार्वर्ड प्रशासनाच्या लक्षात येताच मार्कवर कॉपीराईट उल्लंघनाचे आरोप निश्चित करत त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. कालांतराने विद्यापीठाने हे आरोप मागे घेतले. फेसमॅशच्या यशाने प्रेरित झालेल्या मार्कने जानेवारी २००४ मध्ये सोशल स्टडीटूल साठी दफेसबुक.कॉम हे नवीन पोर्टल कॉमेंट्सच्या सेक्शनसहित चालू केले. पाहता पाहता हार्वर्डचे विद्यार्थी त्यावर नोट्स शेअर करू लागले. आणि इथूनच खरी सुरूवात झाली फेसबुकच्या वेगवान प्रवासाला. अमेरिकेतील विद्यापीठांत नव्याने दाखल होणार्‍या विद्यार्थी कर्मचाऱ्यांची नावे फेसबुक नावाच्या एका कागदावर लिहीण्याची परंपरा आहे. यावरूनच मार्कने 'फेसबुक' हे नाव निश्चित केले.
हार्वर्ड विद्यापीठापुरते मर्यादीत असलेले दफेसबुक.कॉम मार्च २००४ पर्यंत कॅनडा आणि अमेरिकेतील इतर विद्यापीठापर्यंत पोहोचले. जून २००४ मध्ये पेपाल कडून पहिली गुंतवणुक मिळताच या सोशलस्टडी टूलचे अर्थकारण सुरू झाले. लगोलग मार्कने दफेसबुक.कॉमची हायस्कूल आवृत्ती तयार केली. अपेक्षेप्रमाणे ती देखील लोकप्रिय झाली. २००६ सालच्या सुरूवातीलाच मार्कने पुढचं पाउल टाकत अॅपल, मायक्रोसॉफ्ट सारख्या मातब्बर आयटी कंपन्यांमधील कर्मचार्‍यांसाठी फेसबुकचे जाळे खुले केले. तोवर फेसबुक.कॉम हे फेसबुक.कॉम बनले होते. ही पायरी देखील अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाली. २६ सप्टेंबर २००६ साली फेसबुकने आपले दरवाजे सार्‍या जगासाठी खुले केले आणि सुरूवात झाली एका नव्या वर्चुअल विश्वाच्या निर्मितीची.
सुरूवातीला फेसबुकच्या प्रगतीला सिलिकॉन व्हॅलीने फारसे मनावर घेतले नाही. २००७ साली फेसबुकची किंमत १५ मिलिअन डॉलरवर पोहोचली तेव्हा मात्र याहु, गुगल, मायक्रोसॉफ्टने एफबीचा धसका घेतला. फेसबुकच्या उत्पन्नाचे एकमात्र साधन म्हणजे जाहीराती. आणि ह्या जाहीरातीतून येणारा नफ्याची टक्केवारी ही प्रतिवर्षी १८८% एवढी मोठी आहे. फेसबुकच्या वाढत्या लोकप्रियतेचा सर्वात जास्त फटका बसला तो गुगलला. नेटीझन्स हे गुगलपेक्षा अधिक काळ फेसबुकवर राहणे पसंत करतात असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. फेसबुकचे आज जगातील १५ देशांत कार्यालये असून  ३५०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
फेसबुकच्या अफाट व वेगवान लोकप्रियतेची अनेक कारणे आहेत. पण महत्त्वाचे कारण म्हणजे फेसबुकचा संस्थापक सीईओ मार्क झुकरबर्गची व्यावसायिक दूरदृष्टी. फेसबुक.कॉम हे आज अख्ख्या जगात एफबी या नावाने लोकप्रिय आहे. नेटिझन्सना एड्रेसबारमध्ये एफबी टाकताच फेसबुकवर जाता यावे यासाठी मार्कने तब्बल ८.५ मिलिअन डॉलर मोजून अमेरिकन फार्मब्युरो फेडरेशनच्या मालकीचा असलेला एफबी.कॉम (fb.com) डोमेन विकत घेतला. आता फक्त एफबी टाईप केले तरी सरळ फेसबुकच्या मुखपृष्ठावर जाता येते. एफबीवर नवीन खाते उघडताना इतर साईट्स सारखी भरमसाठ माहीती द्यावी लागत नाही. लागतो तो फक्त एक इ-मेल आईडी. फेसबुकचा लुकही अगदी सिंपल आहे. निळ्या रंगाचा योग्य वापर करून तयार केलेले टूलबार, साधा पण आकर्षक फाँट, विशिष्ट साच्यात बसवलेले कॉलम्स, कस्टमर ओरिएंटेड जाहीराती, गेमिंग एप्लिकेशन्स, बर्डथे रिमांईंडर, ग्रुप, पेजेस बनवता येण्याची सुविधा हे निश्चितच फेसबुकला ऑर्कुटपेक्षा वेगळे बनवते. ऑर्कुट एकेकाळी भारत, ब्राझील सारख्या विकसनशील देशांत पॉप्यूलर होती. परंतू त्यावरील थीम आणि त्यांचा भडकपणाच ऑर्कुटवरून मन उडण्यासाठी कारणीभूत असल्याचे अनेक नेटीझन्स मोकळेपणाने सांगतात.
एफबीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे त्याचं स्टेटस आणि कॉंमेटचं सेक्शन. बस जे मनात आहे ते लिहा आणि तुमच्या मित्रपरिवाराला त्यावर मनसोक्त व्यक्त होउद्या. काही ग्रुपवर टाकलेल्या पोस्ट्सना हजारो कॉमेंट्स आलेल्या सहज दिसून येतात. फोटो शेअरिंग, लिंक शेअरिंग, टाईमलाईन वर प्रतिक्रिया देत असताना एफबी युजर्स हे कधी काउंटर रिएक्शन मध्ये मग्न होऊन जातात हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. आणि ह्यातून जडते ते कधीही न सुटणारे फेसबुकचे व्यसन. फार्मविले, माफिया वॉर सारख्या गेम्सने तर अनेकांना वेड लावले होते. वर्चूअल शेतीची आयडीयाच एकदम भन्नाटपणे सादर केली गेली होती. एफबीचा वाढता पसारा आणि आगामी काळात होणारी आर्थिक उलाढाल लक्षात घेता मार्कने फेसबुकच्या आठव्या वाढदिवशी पहिल्यावहिल्या आयपीओची घोषणा केली आहे. तज्ञांच्या मते हा आत्तापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणार आहे. जस्ट फॉर फन साठी तयार झालेलं एफबीनं जगभरातील नेटीझन्सना गेल्या वर्षात भरभरून दिलं. काळानुसार एफबी नवनव्या आयडीयासहीत अपग्रेड होत राहणार.. सोबत आपणही अपग्रेड होत राहूया.  फेसबुकला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..  

(पुढील भागासाठी येथे क्लिक करा ) 
(वरिल लेख हा साप्ताहिक कलमनामा मध्ये प्रकाशित झालेला आहे . )  

Saturday, March 10, 2012

LOG - IN -भाग ३


मागील भागावरून पुढे 

आणि इंटरनेटने पहिला हरताळ पाळला ..
गेल्या भागात आपण इंटरनेटची जन्मकथा पाहीली. त्यानंतर आलेल्या एफ टी पी, टेलनेट सारख्या तांत्रिक शोधांमुळे संदेशवहनासाठी असलेल्या इंटरनेटचा वापर माहितीच्या मुक्त संचारासाठी होउ लागला. २००० सालापर्यंत पाश्चात्य राष्ट्रांनी संगणकयुगात दमदार पदार्पण केलेलं होतं. २००१ साली जिमी वेल्स आणि लॅरी सँजर यांनी आपल्या सहकार्यां सोबत इंटरनेटवरिल आणि जगातील सर्वात मोठा माहीतीकोश बनवण्याच्या उद्देशाने विकीपीडीयाची स्थापना केली. अल्पावधीतच या साईटने मोठी लोकप्रियता आणि अफाट वाचक, लेखकवर्ग देखील मिळविला. विकीपीडीयाच्या रुपाने खर्याह अर्थाने माहीतीचं मुक्त संचारण होउ लागलं.
गुगल, याहू, यु ट्यूब, फेसबुक हे युजर जनरेटेड कंटेट एका क्लिकसरशी सर्वांना उपलब्ध करून देतात. त्यांचा डेली ट्राफिक इतका मोठा आहे की, एकट्या गुगलला ९ लाख सर्वर सिस्टीम सुद्धा अपुरी पडत असल्याचे समोर आले आहे. ह्या साईट्सवर येणार्या  ट्राफिकएवढाच जाहीराती आणि त्यातून येणार्याय उत्पन्नाचा ओघ प्रचंड आहे. सॅटेलाईट मिडीयावरिल उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या जाहीराती ह्या इंटरनेट मिडीयमवर वेगाने वळल्या. नेमकं हेच अमेरिका आणि इतर देशातील मिडीया मुगल्सच्या डोळ्यात खुपायला लागले. आणि त्यातूनच जन्माला आली ती दोन बाळे सोपा आणि पीपा.
    
गेलं अख्खं वर्ष गाजलं ते जास्मीन रिव्होल्यूशन आणि भारतातील लोकपाल या कायद्याने. २०१२ ची सुरूवात देखील कायद्यांच्या गाजावाज्यानेच झाली ते म्हणजे सोपा आणि पीपा. अँटी पायरसी विरोधी कायदे असलेले SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट आणि PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट हे अनुक्रमे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव आणि सिनेटचे प्रस्ताव आहेत. इंटरनेटवर अनिर्बंधपणे चालणार्याट पायरसीला आळा घालण्यासाठी हे कायदे उपयुक्त असल्याचं वक्तव्य हे मिडीया जायंट रुपर्ट मरडॉक यांनी केलं आहे. त्यासाठी त्यांनी अनेक कॅम्पेनही चालवली आहेत. 
केवळ डोनेशन वर चालणारं विकीपीडीया हे स्वतः कोणतीही जाहीरात स्विकारत नाही. माहीती आणि ज्ञानाचं मुक्त संचारण करणे, एका क्लिकवर हवी ती माहीती उपलब्ध करवून देणे, प्रत्येकाने आपआपल्या परिने योग्य, खरे संदर्भ देत नव्या माहीतीची, पेजेसची भर घालणे असा विकीपीडीयाचा सिंपल फंडा आहे. जिमी वेल्स ने  सोपा आणि पिपा ला विरोध करताना केलेल्या वक्तव्यात ऑनलाईन पायरसीला तीव्र विरोध असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. पण सोपा आणि पीपा सारख्या कायद्यांमुळे व्यक्तिगत आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य धोक्यात येईल आणि कायदेशीर सेन्सॉरशिप बळावेल. मुक्त माहीतीच्या साधनांची गळचेपी आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कंसेट होण्याला हे कायदे जबाबदार ठरतील. पर्यायाने लाखो लोकांसाठी जॉब निर्माण करणार्याक इंटरनेट कंपन्यांना आपला व्यवसाय बंदच करावा लागेल.
बुधवार, १८ जानेवारी रोजी सकाळी ठिक दहा वाजता विकीपीडीयाने ब्लॅकआउट जाहीर केले. सलग २४ तास विकीपीडीया बंद राहण्याची ही पहीलीच वेळ. त्याचवेळी गुगलने देखील आपला लोगो काळ्या रंगाच्या पट्ट्याने झाकून टाकला. आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरूवार १९ जानेवारी, सकाळी १०.३० वाजता विकीपीडीया आणि गुगल पूर्ववत झाले. असा आगळावेगळा हरताळ किंवा संप नेटकर्यां नी पहिल्यांदाच अनुभवला. ह्यावेळी गुगल आणि विकीपीडीयासोबत अन्य संकेतस्थळांनी सुद्धा आपला निषेध नोंदवला होता.. ती पुढीलप्रमाणे.
1.             ProtestSOPA.org,  ह्या संकेतस्थळाने देखील आपला निषेध नोंदवला. SAVE THE INTERNET,  ACT NOW  ह्या स्लोगनसहीत ब्लॅकआउट केले. आपआपल्या सिनेटर्सना फोन करून पिपा आणि सोपा ला असलेला विरोध कळवण्यास देखील विनंती करण्यात आली होती.


2.             बोईंग बोईंग या सायंश फिक्शन मधील लोकप्रिय संकेतस्थळाने २४ तासांसाठी ब्लॅकआउटवर जाताना “Boing Boing could never co-exist with a SOPA world: असा संदेश मुखपृष्ठावर झळकवला होता.

3.             इम्गूर (Imgur) ह्या इमेज शेअरिंग साईटने “blacking out the Imgur gallery on January 18th from 8am-8pm EST चा संदेश झळकावत बंद पाळला होता.

4.             गुगल ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले होते की, आम्ही आमचे चिन्ह हे काळ्या पट्ट्याने झाकणार असून संकेतस्थळ ब्लॅकआउट मध्ये जाणार नाही. परंतू गुगल च्या अमेरिकन होम पेज वर आम्ही हा विषय सातत्याने अग्रभागी ठेवू असे जाहीर केले होते.

5.             मुव्ह ऑन ह्या राजकीय विषयावरिल साईटने  ब्लॅकआउटवर जाताना अमेरिकन काँग्रेस इंटनेट सेंसॉरशिप च्या माध्यमातून भाषणस्वातंत्र्य, लिखाणस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणू पाहत असल्याचे म्हटले होते.

6.             मोझिल्ला फायरफॉक्स ह्या लोकप्रिय वेब ब्राउझर ने आपला लोगो स्टॉप सेंसॉरशिप च्या बँड ने झाकला होता. त्यामुळे गुगल सारखी सर्च इंजिन्स चालू करताना फायरफॉक्स चे पेज चित्रात दाखवल्याप्रमाणे होते.

7.             Reddit पॉप्यूलर लिंक शेअरिंग आणि Tucows ह्या लिंक आणि फाईल्स शेअरिंग मधील लोकप्रिय साईट ने सोशल नेटवर्किंग साईटने सोपा आणि पिपाच्या दुष्परिणामांची माहीती देणारी पेजेस सोबत जानेवारी १८ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ ह्या बारा तासांच्या कालावधीसाठी ब्लॅकआउटवर गेले होते. 
8.             WordPress.org ह्या प्रसिद्ध ब्लॉगिंग साईट्स ने सुद्धा ब्लॅकआउटवर जात आपला निषेध नोंदवला. 
इंटरनेटचा वाढता वापर, त्यातून निर्माण होणारा अवाढव्य नफा, मुक्त अभिव्यक्ती, मोफत माहीतीची उपलब्धता आणि अफाट लोकप्रियता मिळालेल्या सोशल नेटवर्किंग साईट्स नी सोपा आणि पीपाच्या विरोधात रणशिंग फुंकलयं. माहीतीचा मुक्त संचार रहावा आणि तो कोणत्याही पद्धतीने सेंसॉरशिपच्या विळख्यात अडकू नये एवढीच अपेक्षा असणार्‍या आमच्यासारख्या ई-युजर्सचा या सोपा आणि पीपा सारख्या कायद्यांना विरोध आणि या अभिनव हरताळवजा ब्लॅकआउटला पाठिंबा...

क्रमशः

(वरिल लेख हा साप्ताहिक कलमनामा मध्ये साईन इन ह्या सदरात प्रकाशित झालेला आहे . )  

Friday, March 9, 2012

LOG - IN part 2




LOG - IN Part 2
                अख्ख्या जगाला एका फायबर ऑप्टिकल केबलच्या मदतीने आपल्या संगणकावर आणणारं इंटरनेट नेटवर्क हा विसाव्या शतकातील सर्वात क्रांतिकारक शोध ठरलाय. सुरूवातीला कामासाठी आवश्यक असणारे इंटरनेट आज प्रत्येकाचं व्यसन बनलेय असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.  आंतरजालाच्या निर्मितीमागे प्रेरणा म्हणून रशियाबरोबरच्या शीतयुद्धात अमेरिकेच्या बौद्धिक संपत्तीला असलेला धोका फार महत्त्वाचा घटक असला तरी एका राष्ट्राच्या द्रष्टेपणाचं प्रतिक म्हणून पाहणेच उचित ठरेल. आजच्या सायबर युगाला जन्माला घालणार्‍या आंतरजालाच्या निर्मितीचा इतिहास हा संबंध मानवजातीच्या विकासाला कलाटणी देणारा ठरला आहे. वास्तविकता अमेरिकेतील नव्यानव्या तंत्रज्ञानाची उत्पत्ती आणि व्यूत्पत्ती ही तेथील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय वैचारिक प्रागतिकतेमुळेच शक्य झाली.  

                १९६० च्या सुमारास, अमेरिका आणि सोव्हियत रशिया या दोन महासत्तांमधील शीतयुद्ध अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे उत्पादन,  विज्ञान संशोधन,  अवकाश उपक्रम, हेरगिरी सारख्या कामांतून शिगेला पोहोचलेला होता. त्याच काळात सोव्हीएत ने ४ ऑक्टोबर १९५७ साली स्पुटनिक १ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून शीतयुद्धात अमेरिकेवर आघाडी घेतली. ह्यामुळे धसका घेतलेल्या अमेरिकेने घाईगडबडीत अपोलो ११ ची घोषणा केली. परंतू अण्वस्त्रसज्ज सोव्हिएत रशियाकडून ज्ञानाचे भांडार उडवले जाण्याचा धोका सतत सतावत होता. असे झाल्यास सारे तंत्रज्ञान इतर ठिकाणी एकाच वेळी, एकाच तर्‍हेने, सर्व ठिकाणी सारखेच कसे राहील ? यावर चर्चा सुरू झाली. आणि अमेरिकन लष्कराने सर्व आण्विक, क्षेपणास्त्र व इतर तंत्रज्ञान संबंधित माहिती एका नेटवर्कद्वारे जोडण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टिने वेग वाढविला.

       आंतरजाल म्हणजेच आत्ताच्या इंटरनेटच्या जन्माची कहाणी सुरू झाली ती १९६२ साली. जेव्हा  एमआयटी युनिव्हर्सिटीमधील प्रो. लीकलायडर हे त्यांच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ कम्प्यूटर्स संकल्पनेला घेउन जगासमोर आले. आज प्रो. लीकलायडर इंटरनेट पायोनिअर म्हणून ओळखले जातात. इंटरनेटची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारा आर्थिक नीधी व राजकीय पाठिंबा त्यांनी डार्पा (DARPA - डिफेन्स ऍडवान्स्ड् रिसर्च प्रॉजेक्ट एजन्सी ) च्या साहाय्याने उभा केला. आणि लगोलग संशोधनाला सुरूवात देखील केली. संगणकजाल अपेक्षेनुसार विणले गेले. पण त्याची उपयुक्तता सिद्ध होण्यासाठी दोन संगणकात ईलेक्ट्रॉनिक कम्यूनिकेशन होणे फार महत्त्वाचे होते. हा संवाद घडवून आणण्यासाठी लॉरेन्स रॉबर्ट्स यांनी १९६५ साली मॅसच्यसेट्स आणि कॅलिफोर्निया या दोन पूर्व – पश्चिम सीमांवर विराजमान असलेल्या प्रांतांतील दोन संगणक टेलिफोन वायरींच्या मदतीने जोडले. आणि या टेलिफोन वायरींच्या माध्यमातून जादूईरित्या प्रथमतःच दोन संगणकांना इलेक्ट्रनिकली बोलते केले. एका संगणकाने दुसर्‍या संगणकाला फोन करावा आणि पलीकडील संगणकाने योग्य प्रतिसाद द्यावा हे तसे अनोखे. पण हे अनोखे असे अशक्य काम शास्त्रज्ञांनी हे शक्य करून दाखविले. आत्ता ही बाब झाली केवळ दोन संगणकांच्या बाबतीत. पण जेव्हा गोष्ट जगातल्या असंख्य संगणकांची येते तेव्हा टेलिफोन वायरचे हे तंत्रज्ञान तोकडे पडणार हे लीकलायडर यांना ठाऊक होते. आणि म्हणूनच टेक्नोलॉजी अपडेट करण्यासाठी सारेच कसोशीने प्रयत्न करू लागले.
अशातच यूसीएलए स्कूल ऑफ इंजीनिअरिंग एंड अप्लाईड सायन्सेस मध्ये १९६२ साली प्रा. लिओनार्ड क्लनरॉक हे त्यांच्या मॅथामॅटिकल थेअरी ऑफ पॅकेट नेटवर्क्स वर पीएचडी प्रंबंध तयार करण्यात गुंतले होते. संशोधन कार्य चालू असतानाच त्यांनी नेटवर्क राउटिंग ची कल्पना समोर आणली. राउटर विकसित करण्यासाठी आधी पॅकेट स्विचिंग चं तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे होते हे त्यांनी हेरले. आणि यातूनच आंतरजालाच्या निर्मितीला प्रचंड वेग आला. पॅकेट स्विचिंग हा तसा तांत्रिक शब्द. परंतू याचा वापर आपण नियमित व्यवहारात अनेकदा करत असतो. एखादा इमेल लिहीताना आपण त्याला एकाच स्वरुपात तयार करतो. पण अनेकांना पाठवताना आपण टाकलेल्या पत्त्यांवर तो सारख्याच रुपात सगळ्यांना पोहोचतो म्हणजे पत्र तर एकच लिहीलेले असते पण सगळ्यांना ते सारखेच मिळते. कारण पॅकेट स्विचिंग एकाच स्वरुपातील माहीती असंख्य प्रमाणात, असंख्य पाकिटात भरून असंख्य लोकांपर्यंत किंवा त्यांच्या संगणकापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करते. परंतू आपण पाठवलेली माहीती ही नेमकी त्या संगणकापर्यंत पोहोचली आहे की नाही हे तपासण्याचे खात्रीदायक काम राउटरचा करतो. म्हणजे पॅकेट स्विचिंग जर टपाल खाते असेल तर राउटर हे पोस्टमन आणि ह्यांना एकत्रितपणे मिळालेलं पूर्ण रुप म्हणजेच आंतरजाल. ह्याच आंतरजालाचा सर्वप्रथम उपयोग डार्पाने अमेरिकेतील सारे मिलीटरी बेसेस एकमेकांशी जोडताना केला. हेच जगातील पहिले वहिले इंटरनेटवर्क.   
१९६६-६७ च्या सुमारास पॅकेट स्विचिंग आणि राऊटर पूर्णतः विकसित होताच लॉरेन्स रॉबर्ट्स यांनी डार्पाकडे धाव घेतली. नव्यानेच विकसित झालेल्या आंतरजालाचा उपयोग हा केवळ लष्करी कार्यापुरता मर्यादित न राहता त्याचा विस्तार राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यवसायिक, पत्रकारिता, प्रशासनव्यवस्था,  कलाक्षेत्रे,  सारी वाणिज्य क्षेत्रांमध्ये करण्यासाठी डार्पाला साकडे घातले. लॉरेन्स रॉबर्ट्स च्या या प्रतिपादनाला गंभीरतेने घेताना डार्पाने अनेक तज्ञ, विद्वान मंडळींची मते मागविली व त्यांनी संरक्षणात्मक कार्यासाठी असलेल्या डार्पा चे आर्पा मध्ये रुपांतरण करण्याचे सुतोवाच केले. त्यानुसार डार्पा ची सुधारीत आवृत्ती आर्पा- ARPA (ऍडवान्स्ड् रिसर्च प्रॉजेक्ट एजन्सी) ची स्थापना झाली. बॉब टेलर यांनी आर्पाच्या नेतृत्वात तयार होणार्‍या नव्या नेटवर्कची सारी रुपरेषा तय्यार करून घेतली. ठरल्याप्रमाणे कंत्राट काढले गेले. ते कंत्राट मॅसॅच्युसेट्समधल्याच बीबीएन या कंपनीला ७ एप्रिल १९६९ रोजी देण्यात आले. अल्पावधीतच बीबीएमने त्याच वर्षी आर्पासाठी नव्या संवादजालाची निर्मिती केली. आणि त्याचे नामांतर आर्पानेट असे केले.
सुरूवातीला आर्पानेटच्या अधिपत्यात अमेरिकेतील चार प्रसिद्ध विद्यापिठांचे संगणक होते. पुढे जून १९७० ला  एम आय टी, हार्वर्ड विद्यापिठे, बीबीएन स्वत: आणि सँटा मोनिका येथील कंम्प्यूटर्स या जाळ्यात विणण्यात आले. १९७१ साल सुरू होताच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी,  लिंकन लॅबोरेटरी,  कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी या आर्पानेटमध्ये जोडण्यात आले. जेव्हा नासा आर्पानेटच्या कव्हरेज मध्ये आले तेव्हा खर्‍या अर्थाने वैज्ञानिक संशोधनाला नवे आयाम मिळाले. विद्यापीठांमधील आंतरजालांची उपयुक्तता हळूहळू सिद्ध होत होती. १९७२ साली त्यात इमेल ची सुविधा देखील सामाविष्ट केली गेली.
आता खर्‍या अर्थाने जगाचा चेहरा हळूहळू बदलायला सुरूवात झाली होती. १९७२ साल अमेरिकेत उजाडले ते ई-मेल च्या शोधाने जेव्हा भारतात आपल्या आप्तांना तार पाठवणे हे महादिव्य काम समजले जात होते. अमेरिकन भूमी ही अनेक शोधांची जननी आहे, पण त्याचवेळी भांडवलवादाचे उद्गाते असणार्‍या अमेरिकनांनी सारे अविष्कार हे नेहमी नफ्याच्याच परिप्रेक्षातून सार्‍या जगापर्यंत फार उशीरा पोहोचवले.
१९७२ सालापर्यंत ईमेसेजेस म्हणजे इमेल अमेरिकन जगताला सुपरिचीत झाले होते. पण आर्पानेटच्या प्रथमिक अवस्थेतील ह्या इंटरनेटला ला सर्वसमावेशक रुप देणारे वर्ल्ड वाईड वेब चे तंत्रज्ञान विकसित होण्याच्या मार्गावर होते. टिसीपी असो किंवा डिफॉल्ट गेटवे नाहीतर आंतरजालाचा वापर सामान्यांसाठी सुकर करून देणारे एफ् टी पी, टेलनेट् चे शोध लागण्याच्या प्रतिक्षेत होते. त्याबद्दल पाहूयात पुढच्या भागात..
             
क्रमशः (पुढील भाग येथे वाचा) 
(वरिल लेख हा साप्ताहिक कलमनामा मध्ये साईन इन ह्या सदरात प्रकाशित झालेला आहे . )  

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons