Showing posts with label पत्रकारिता. Show all posts
Showing posts with label पत्रकारिता. Show all posts

Sunday, November 13, 2011

भारतातील पहिल्या महिला संपादिका : तानुबाई बिर्जे




कृष्णाजी भालेकर यांनी १८७७ मध्ये सुरू केलेल्या दिनबंधु या वृत्तपत्राचं संपादकपद १९०६ ते १९१२ या काळात तानुबाई बिर्जे यांनी साभाळलं. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील त्या पहिल्या संपादिका ठरल्या. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या तानुबाईंनी संपादक म्हणून आपल्या अग्रलेखातून समाजातील विषमतेवर प्रहार करून त्याची चिरफाड केली. बहुजन शिक्षणाचा विचार मांडला. नाविन्यपूर्ण विषय हाताळले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणा-या तानुबाईंची ही ओळख..





तानुबाई बिर्जे हे नाव महाराष्ट्रात परिचित नाही. अलिकडच्या काळात तानुबाईंना महाराष्ट्रात फारसे कुणी ओळखत असल्याचे ऐकिवात नाही. तानुबाई आणि त्यांचे दिनबंधुवृत्तपत्र यांची दखल वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासातही फारशी कुणी घेतली नाही. सत्यशोधक चळवळीतील विचारांशी बांधिलकी असणा-या अनेक वृत्तपत्रांची दखल मराठी वृत्तपत्रसृष्टीने घेतली नाही. मात्र, ज्यावेळी महिलांना चूल आणि मूल यापलीकडे पाहिलं जात नव्हतं, अशा काळात तानुबाईंनी सत्यशोधकीय पत्रकारितेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती चोखपणे बजावली. हे समजलं तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. सत्यशोधकीय चळवळ ही महात्मा जोतिबा फुलेंनी सुरू केली आणि त्यांना अनेक ब्राह्मणेतर समर्थक लाभले. दिनबंधुचे पहिले संस्थापक-संपादक कृष्णाजी भालेकर यांनी 1877 ध्ये सुरू केलेल्या या वृत्तपत्राचं नंतरच्या काळात संपादन तानुबाई बिर्जे यांनी उत्कृष्टरीत्या केलं होतं. त्या भारतातील पहिल्या महिला संपादक ठरल्या. परंतु भारतातीलच नव्हे तर जगातील त्या पहिल्या संपादक असाव्यात, असा निष्कर्ष काढला जात आहे. त्या काळात भारतातील पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांचं नाव गाजलं, परंतु पत्रकारितेच्या इतिहासाने तानुबाईंची योग्य प्रकारे दखल घेऊन त्यांना प्रकाशझोतात ठेवलं असतं तर आज हजारो महिला पत्रकारिता क्षेत्रात पुढे आल्या असत्या.

महात्मा फुलेंचे सहकारी व शेजारी देवराव ठोसर यांची कन्या व सावित्रीबाई फुले यांची मानसकन्या तानुबाईंचा जन्म 1876 मध्ये पुण्यात झाला. त्यांचं शिक्षण वेताळपेठेतील महात्मा फुलेंच्या शाळेत झालं, तर 26 जानेवारी 1893 रोजी पुण्यामध्ये वासुदेव लिंबोजी बिर्जे यांच्याशी सत्यशोधकीय पद्धतीने त्यांचा विवाह झाला. वासुदेव बिर्जे यांनी बडोदा सरकारमध्ये त्यांनी 1894 ते 1905 अशी अकरा वर्षे ग्रंथपाल म्हणून कार्य केलं. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन दिनबंधुहे वृत्तपत्र 1897 मध्ये पुन्हा सुरू केलं. कृष्णाजी भालेकर यांनी 1 जानेवारी 1877 रोजी सुरू केलेलं हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे बंद पडलं होतं. 1880 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी ते मुंबईतून सुरू केलं. त्यानंतर 1897 मध्ये बिर्जे यांनी त्याची जबाबदारी घेतली व ते 1906 पर्यंत चालवलं, मात्र 1906 मध्ये प्लेगने त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते वृत्तपत्र पुन्हा बंद पडते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र पतीनिधनानंतर डगमगून न जाता प्रबोधनाचे कार्य तानुबाई बिर्जे यांनी पुढे चालू ठेवले. तानुबाईचे वडील देवराव ठोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि सत्यशोधकच होते. महात्मा फुले यांच्या घराशेजारीच त्यांचं घर होतं. त्यामुळे फुले दांपत्याचा सहवास तानुबाईंना लहानपणीच मिळाला. वडील ठोसर व पती बिर्जे यांच्या संस्कारातून तयार झालेल्या तानुबाईंनी दिनबंधुचालवायला घेतले आणि जगातल्या पहिल्या संपादक बनण्याचा लौकिक मिळवला. हे वृत्तपत्र त्यांनी 1906 ते 1912 पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे चालवून संपादिका म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

तानुबाईंनी त्यांच्या संपादकपदाच्या कारकीर्दीत दिनबंधुमध्ये सत्यशोधक चळवळीच्या वृत्तांवर भर दिला. समाजाला आत्मभान यावे म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची वचने दिनबंधुमध्ये छापली. तुकाराम महाराजांचे अभंग अग्रलेखाच्या शिरोस्थानी प्रसिद्ध करून तानुबाईंनी एका अर्थाने दिनबंधुचे उद्दिष्ट कथन केले होते. वासुदेव राव बिर्जे यांनी सातत्याने बहुजनांच्या सर्वागीण उन्नतीसाठी शिक्षणाच्या अनुषंगाने विचार मांडले तर तानुबाईंनी बहुजन शिक्षण पॅटर्नसह विविध विषयांवर लेखन केले. समाजजागृतीच्या हेतूने 1912 मध्ये दिनबंधुमध्ये एक नाविन्यपूर्ण विषय हाताळण्यात आला आहे. देशाच्या स्वातंत्र्याची पहाट उजाडण्यास मोठा अवधी असताना त्यांनी भारतासारख्या खंडप्राय देशात लोकशाही शासनप्रणाली अंमलात आणण्यासाठी हिंदुस्तान लायक आहे का, असा प्रश्न उपस्थित करून अभ्यासू लेखमाला प्रसिद्ध केली. अग्रलेखाच्या मांडणीवरून तानुबाईंच्या प्रतिभेची झेप किती मोठी होती, याची कल्पना येते.

तानुबाईंच्या एकूण लेखमालेवर फुले, भालेकर, लोखंडे आणि बिर्जे यांच्या लेखनाचा प्रभाव जाणवतो. 27 जुलै 1912 च्या अंकातील मुंबई इलाक्यातील लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि बहुजन समाजहे तनुबाईंचे आणखी एक असाधारण ऐतिहासिक, राजकीय आणि धारदार संपादकीय आहे. या संपादकीयामध्ये तानुबाई म्हणतात, ‘कायदे कौन्सिलात बहुजन समाजाच्या हिताविषयी अनास्था दिसून येत आहे. या अनास्थेचे कारण शोधण्यास दूर जावयास नको. मराठीत एक म्हण अशी आहे की, ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल. बहुजन समाजाच्या दु:खांनी हल्लीच्या कौन्सिलातील लोकनियुक्त अथवा सरकारी सभासदांचे पोट दुखत नाही. कारण त्यांचा बहुजन समाजाशी निकटचा संबंध नाही. श्रीमंत आणि गरीब या भेदाशिवाय हिंदुस्थानात नाना जाती आणि पंथ आणि धर्म यांचे जाळे पसरलेले आहे. या अनेक भेदांनी बहुजन समाजास या देशात राजकीय अस्तित्वच नाही, असे म्हटले असता चालेल. याप्रमाणे कायदे कौन्सिलात किंबहुना सरकार दरबारात ज्या लोकांचा प्रवेश होऊ शकतो अथवा होत आहे, त्या लोकांच्या आणि बहुजन समाजाच्या चालीरीती व आचार-विचार यामध्ये महद अंतर असल्यामुळे कौन्सिलात सभासदांस या मुक्या समाजाची ओरड ऐकू जावी कशी अणि त्यांनी सरकारपाशी या मुक्या समाजाचे पोट दुखत आहे म्हणून ओवा मागावा कसा हा एक मोठा प्रश्न आहे. याचे कारण काय? याचे कारण हेच की, ‘तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळाचे काम नाही, न ये नेत्रांजळ, नाही अंतरी कळवळा’.

तानुबाईंनी समाजातील विषमतेवर प्रहार करून त्याची चांगलीच चिरफाड आपल्या अग्रलेखातून केली. सत्ता चिरंतन राहावी म्हणून चार वर्णाचा पुरस्कार करणा-या मनुस्मृतीला राजघराण्यांनी आपलेसे केले. त्यामुळे समाजात विषमता निर्माण झाली. मात्र, गौतम बुद्धाच्या कालखंडात समता प्रस्थापित झाल्याचे नमूद करून त्यांनी पुढे म्हटले आहे, ‘शंकराचार्यानी मंडनमिश्रावर मिळवलेल्या विजयानंतर पुनश्च वेदांत बोकाळला. ब्राह्मण हा देवांचाही देव समजला जावा, अशा प्रकारची योजना, ब्राह्मण हिंदुशास्त्राकारांनी करून ठेवलेली आहे. परंतु, फार पुढे इंग्रजांचे राज्य देशावर चालून आले. इंग्रजांनी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या सुधारणांचा आढावा घेऊन याविरोधात येथील उच्चवर्णीयांनी समान हक्कांची मागणी करून स्वहितासाठी राष्ट्रीय सभा (काँग्रेस) स्थापन केली.यावरून तानुबाईंची सामाजिक जाणीव, बहुजनांच्या उत्थानासाठी तळमळ आणि देशातील सामाजिक सुधारणांसाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे ध्येय यांची कल्पना येते. एक अत्यंत यशस्वी, सक्षम संपादक म्हणून त्यांचे नाव मराठी पत्रकारितेच्या इतिहासात नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल.

साभार- राही भिडे, दै. प्रहार.
http://www.prahaar.in/madhyantar/streevidha/23004.html

Wednesday, November 2, 2011

माध्यमांचं इवॉल्यूशन



जगातील कोणत्याही लोकशाहीच्या पोषक वाढीसाठी सशक्त प्रसारमाध्यमांची नितांत आवश्यकता असते. त्यासाठीच आपल्या लोकशाहीची चार प्रमुख स्तंभ ठरविताना घटनाकारांनी प्रसारमाध्यमांना चारपैकी एका स्तंभाचा दर्जा बहाल केला, यातच सारे काही आले. बदलत्या काळानुसार प्रसारमाध्यमांचे रुप आणि साधनं देखील बदलत गेली. थोडक्यात, अपडेट होत गेली. साध्या कागदापासून सुरूवात करणार्‍या पत्रकारीतेने आज वर्च्यूअल इ-पेपर पर्यंत यशस्वी मजल मारलेली आहे. याच प्रसारमाध्यमांनी मोठमोठी आंदोलने उभी केली. आणि यशस्वी करताना समाजेतिहासच बदलवून टाकण्यात मोलाची भूमिका बजावलीये. आजच्या काळातील सोशल नेटवर्किंग साईट्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध झालेली सारी विचारमंचे ही आधुनिक पद्धतीची प्रसारमाध्यमेच आहेत यात कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. ह्या निमित्ताने केलेला हा उहापोह...    

गेल्या काही दिवसांपूर्वी कॉमस्कोअर आणि PEW या अमेरिकेतील जागतिक शोध संस्थांनी इंटरनेट सबंधी केलेल्या सर्वेक्षणात अगदी मजेशीर गोष्टी समोर आल्या आहेत. या सर्वेक्षणानुसार १५ ते ३५ वयोगटातील लोक सर्वाधिक वेळ इंटरनेटवर घालवतात. अर्थात हा वापर सोशल नेटवर्किंग साट आणि मोबाइल इंटरनेट कनेक्टिविटी, स्वस्त दरात झालेली उपलब्धता, व माध्यम म्हणून वापरण्यात येणारा सुटसुटीतपणामुळे ही संख्या वाढल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. भारतातील इंटरनेटचा वापर ब्रिक देश त्याचबरोबर अमेरिका, जपान आणि युरोपीय देशांपेक्षाही अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. जून महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधन अहवालात प्रथमच भारताने एवढी मोठी आघाडी घेतल्याचे समोर आले आहे. देशातील सुमारे तीन कोटी 50 लाख लोक हे सायबर कॅफेमधून इंटरनेटचा वापर करतात. तर चार कोटी 30 लाख लोक घरून किंवा ऑफिसमधून इंटरनेटचा वापर करतात. मात्र प्रति व्यक्ती इंटरनेटचा वापर पाहायला तर, तो वापर साडे बारा तास होता. हा वापर जगातील इतर देशांच्या तुलनेत खूप कमी आहे. त्याचबरोबर देशातील पुरूष इंटरनेटचा वापर अधिक करत असल्याचेही या संशोधनात समोर आले आहे. मात्र 35 ते 44 या वयोगटात महिला सर्वाधिक इंटरनेटचा वापर करत असल्याची बाब यातून समोर आली आहे. या वयोगटातील दर 10 पुरूषांसमोर 12 महिला इंटरनेटचा वापर करतात.

इंटरनेटचा वापर कशासाठी केला जातो, यासाठी केलेल्या विशेष सवेर्क्षणात सर्च इंजिनचा 87 टक्के युजर्स वापर करतात. 85 टक्के युजर्स सोशल नेटवर्किंग साइट, 78 टक्के ई-मेल्स, 58 टक्के बातम्यांसाठी आणि शिक्षणासाठी 41 टक्के युजर्स इंटरनेटचा वापर करत असल्याचे या अहवातात स्पष्ट करण्यात आले आहे. एका वर्षभरात सोशल नेटवर्किंग साइटच्या युजर संख्येमध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाल्याची बाबही या संशोधनात समोर आली आहे. तर फेसबुकच्या युजर्सची संख्या 2010च्या तुलनेत दुप्पट झाली आहे. मात्र ई-मेल्ससाठी इंटरनेटचा वापर करण्याऱ्यांचे प्रमाण मात्र सारखेच राहिले आहे.  

पण त्यापेक्षा धक्कादायक वाटणारी माहीती अशी की, इंटरनेट वरिल विविध साधने आणि मोबाईल वरील साधने (mobile application) वापरात आणून जास्तीत जास्त वेब कंटेट निर्माण करण्यात जगातील कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक वंशाचे लोक अग्रस्थानी आहेत. वरकरणी पाहता ही बाब केवळ सर्वेक्षणातून समोर आलेला निकाल आहे असे जरी वाटत असले तरी यामागे एका मोठ्या सामाजिक व्यवस्थेची खोल दरी असल्याचा निर्वाळा मिळतो. का म्हणून कृष्णवर्णीयच किंवा हिस्पॅनिक किंवा भारतीय वंशाच्या लोकांचा कंटेट जनरेशन मध्ये अग्रक्रम आहे?

या प्रश्नावर चर्चा करताना नेमके असे उत्तर देता येणे कठिण आहे परंतू त्यांवर चर्चा होणे जरूरी आहे. प्रसारमाध्यमे ही प्रत्येकाची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तिला व्यक्त होण्याच्या नैसर्गिक व जन्मसिद्ध हक्क आहे. परंतू व्यक्त होण्यासाठी लागणारे माध्यम मात्र संकुचित असल्याने त्याला एक मर्यादा होती. पण ती कसरही आता इंटरनेट ने भरून काढली. आजही अमेरिकेतील वंशवाद आणि वर्णभेद हा पूर्णतः संपलेला नाही. भारतातील जातीयवाद देखील संपलेला नाही. जग आजही आहे रे आणि नाही रे गटांत विभागले गेलेले आहे. मुठभर लोकांनी नेहमीच बहुजनांना कधी वर्णभेद तर कधी वंशभेद, जातीभेद, प्रांतभेद तर कधी धर्मभेदाच्या जहाल कारणांखाली दमन करत स्वतःचे वर्चस्व अबाधित राखले. प्रसारमाध्यमे देखील याला अपवाद नव्हती. लोकप्रतिनिधी बनण्याऐवजी मुखपत्रांसारखीच सारी प्रसारमाध्यमे वागवून घेतली जाउ लागली. प्रत्येक ठिकाणी अगदी प्रिंट पासून ते इलेक्ट्रॉनिक मिडीयम पर्यंत सगळ्यांचीच सेंसॉरशिप वेगाने धावत होती. यामुळे माध्यमहीन समाजाचा एक मोठा गट निर्माण झाला होता आणि अजून आहे देखील. हाच एक वर्ग स्वतःसाठी एका सशक्त माध्यमाचा शोध घेत होता. आणि ते माध्यम त्याला इंटरनेट आणि त्यावरील सोशल नेटवर्किंग साईट्स च्या रुपाने मिळाले. ज्या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी मनोनीत स्वातंत्र्य होते असे हक्काचे ठिकाण मिळणे ही खरे तर इतिहासातील एक मह्त्तवपूर्ण घटनाच मानावली लागेल. आखाती देशांतील हुकुमशाहीविरोधातील सांप्रत स्थिती ही केवळ आणि केवळ स्थानिकांना इंटरनेट ने जगाची आणि लोकशाहीच्या कल्याणकारी संकल्पनेची जी महाद्वारे उघडून दिली त्याचाच परिपाक आहे. आज भारतापुरते बोलायचे झालेच तर एक गोष्ट प्रामुख्याने विचारात घ्यायला हवी ती म्हणजे भारतातील प्रसारमाध्यमे, त्यांची पोहोच, वापर, उपयुक्तता, प्रभाव आणि त्यांची मालकी...   

भारतातील जवळपास ९०% प्रसारमाध्यमे ही अभिजनांच्या मालकीची आहेत. ज्या ठिकाणी उर्वरित बहुजनांना काहीच स्थान नाही, कोणतेही प्राधान्य नाही. लेखकांच्या लेखाला प्रकाशिक करण्याअगोदर त्याचे आडनाव पाहण्याचा या पत्रकारीतेचा दंडक आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंड करून उठणार्‍या अभिजन लेखकांना देखील वाळीत टाकण्याची संस्कृती जोपासणारी ही प्रसारमाध्यमे आहेत. पण काळानुरूप परिस्थिती बदलते. परिस्थिती बदलत्या काळात मानवी बुद्धीला अधिक प्रगल्भ होण्याची संधी मिळवून देत असते. आज एखादे चांगल्या दर्जाचे व उच्च प्रतीचा कागद वापरणारे वृत्तपत्र सुरू करायचे असेल तर किमान २० कोटींच्या आकडेएवढी द्रव्यसंप्पती असायला हवी. एखादी वृत्तवाहीनी किंवा कोणतीही मनोरंजनात्मक वाहिनी (Electronic channel) सुरू करायचे आजले तर किमान एक अब्ज तरी लागतातच. पण इंटरनेटचे तसे नाही. स्वतःची अनलिमिटेड स्पेस ची वेबसाईट डेव्हलप आणि होस्ट करण्याचा खर्च हा अगदी ५ ते १०,००० रुपयांत होउन जातो. जे तुमच्या स्वतःच्या मालकीचे असते. खिशात मोबाईल असला तर अवघ्या ५ रुपयांत आणि जरी नसला तरी विशेष असा फरक पडत नाही. केवळ १५ रु. प्रती तास कोणत्याही सायबरमद्ये  साध्यातली साधी व्यक्ती ही महाजालावर स्वतःचे मत अगदी परखडपणे, कोणाचीही सेंसॉरशिप न बाळगता व्यक्त करू शकते. जर तुम्ही मांडलेल्या मतामध्ये खरचं दम असेल तर जगातल्या करोडो वाचकांपर्यंत तुम्ही सहजच पोहोचू शकता. माझा स्वतःचा असा विश्वास आहे, होय आत्ताशी कुठे वेब मिडीयमचं विशअव आम्हाला उलगडतयं. येउद्या एकदा हे वेब मिडीयम पुर्णतः हातात येउद्या. ग्यारंटी देतो. एकापेक्षा एक सरस लेखक, कलावंत, विचारवंत ह्या देशाला मिळतील. कारण त्यांना मुक्त स्वैर होण्याचं आकाश लाभलेलं असेल म्हणूनच...

सोशल नेटवर्किंग साईट्सपुरताच विचार केला तर एक गोष्ट निश्चितपणे सांगता येईल की हो, समाजातील कायम उपेक्षित राहीलेल्या घटकाला याचा खुप फायदा होणार आहे. थोडासा का होईना एक कनिष्ठ मध्यमवर्ग हा उपेक्षितांमध्ये देखील उदयाला आला आहे. तोच आत्ता उर्वरित समाजाला या जोखाडातून सोडवण्याची मनिषा बाळगून आहे. ज्यांना सांप्रत प्रसारमाध्यमांत कोणतेही प्रतिनिधीत्व नाही तोच मध्यमवर्ग सोशल नेटवर्किंगचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे आढळून आले आहे. याआधी कोणालाही एखाद्या बड्या संपादकांवर टिका करण्यासाठी कोणतीही सोय नव्हती पण ती ह्या माध्यमाने पूरी केली. भारतातील एकुण एक जाती-संप्रदाय, त्यांचे होणारे दमन, त्यांची सद्यस्थिती जगभरात पोहोचू लागली आहे. माध्यमांवर मोनोपोली ठेवणारा वर्ग मात्र यामुळे फार दुखावला गेल्याचे दिसून येत आहे.

याआधी माध्यमांमधून लेखक हा वाचकांशी संवाद साधण्याचे काम करीत असत. कारण प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे ही केवळ वन वे कम्यूनिकेशन ची सोय पुरवितात. परंतू सोशल नेटवर्किंग साईट्स ह्या लेखकाचा वाचकांशी आणि वाचकांचा लेखकांशी संवाद घडवून आणण्याची किमाया साधतात ते ही अगदी कमी वेळात, कोणतेही अतिरिक्त कष्ट न घेता,  किंवा कोणताही अतिरिक्त खर्च न करता, अगदी आपल्या सोयीच्या ठिकाणी. वर्तमानपत्रे ही केवळ वर्तमानातच वाचली जातात परंतू सोशल नेटवर्किंग साईट्स वरिल हर एक प्रकारचे कंटेट केवळ एका सर्च वर आपल्यासाठी उपलब्ध होते. यात महत्त्वाचे असे की. या ठिकाणी वाचक हा एक निष्क्रिय खरेदीदार मुळीच नसतो. त्याला आवडलेल्या आणि नावडलेल्या दोन्ही उत्पादनांवर धडक, थेट आणि तात्काळ प्रतिक्रिया देण्याची तय्यारी ठेवून असतो. त्यामुळे एकेकाळी केवळ मनोरंजनासाठी असलेले हे माध्यम आता सामाजिकदृष्ट्या अधिक गंभीर बनले आहे. कारण या माध्यमांमुळे ओपिनियन मेकर्सचे राज्य संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जाउ लागलीये. हेच ह्या माध्यमजगतातलं नवं आणि प्रभावी इवॉल्यूशन आहे.
        



Tuesday, November 1, 2011

In The Memory of S.P



Just about a week ago, an hour-and-a-half of nirgun bhajans at a quiet function in the Capital marked the passage of two year since Surendra Pratap Singh was removed from the midst of his family and friends by a cerebral stroke. At the India International Centre(IIC), people driven by diverse persuasions and with varying backgrounds gathered, drawn by a common chord that SP Singh represented to all of them.

As always, time has flown. The last two years have been consumed in a particularly inordinate, and chaotic, hurry. The media, which SP Singh first as a print journalist and later as the brain behind Aaj Tak, impacted in a decisive fashion, has had its hands full. It has been full time, demanding job to report, comment and analyze events that are even now shaping India of the next millennium.

Pictures and words struggle to capture the defining moments of the nation’s pell mell entry into the 21st Century. The formation of a saffron-led Government at the Centre, the momentous Pokhran-II nuclear tests, the life on the edge experience of the Vajpayee regime, Jayalalitha Jayaram’s tea party, Congress under Sonia and the sight of wagon loads of young troops heading for the icy inclines of Kargil.

Even as the nation awaits the final outcome of the border clash with Pakistan, the media is playing an exceptional role, bringing back pictures from very near the actual front, clips of air operations and of poignant funerals in villages that dot the countryside. Reporters have bunkered at forward base camps, telegraphing details of ongoing operations gleaned from men trickling back after fierce fire fights at 16,000 feet.
SP Singh would have plunged head long into the challenge of reporting events which are certain to have the effect of depth charges on India’s self-image as a nation. He was among the few top notch journalistic brains who had the capacity to quickly grasp the wider implications of an emerging situation while others were still grapping at the peripheries. This is perhaps why he could bring to Aaj Tak a degree of depth in perspective not usually seen on TV newscasts.

One of the reasons that SP Singh could focus his remarkable skills with telling results was because he did not let any form of dogma get in the way of a clear headed understanding of events. He demonstrated that the newsperson’s first credo is to approach information in a neutral, searching manner, rather than to move around news which fits that.

As one ponders the many lessons that SP Singh taught us, it is difficult not to take into account a growing sense of intolerance in our public debates and a parallel polarization within the media- both print and television. The pace of political developments has been frenetic, leaving little scope for considered comment. Hustled in part by the electronic age, the need of the hour is encapsulated in an instant wisdom. It would seem that the demand for information requires quick gratification.

As the political and social structures are subjected to frequent fractures imposed by coalition governments, and crisis as wide in scope as Kargil implode on the nation’s consciousness, there is an accompanying " compulsion" to adopt "positions". Without a minute to lose, the era of competition dictates that all answers must be served neatly packaged and with a handy guide to boot. The contentious issues remain the "secular communal" divide, the stability of coalitions, the relevance of caste- based parties, the renewed dynastic leadership of the Congress, even as some old debates have either lost their sting, or have taken a new shape. The growing irrelevance of old-style welfarism as represented in the past by NTR’s "two rupees rice" scheme is an example.

It is in these times that the cool, slightly cynical, partly sardonic journalism that SP Singh excelled in has become rather necessary. Not that his art was detached and bloodless. There was a fierce intensity to his pursuit of news and its inner connotations. There was nothing laidback about that manner in which he sharpened his words- in print or on TV . just a few sentences were enough to sketch a sharply defined canvas.

What was always an extraordinary aspect of SP Singh’s skills as a communicator was his ability to tightly control his reactions to events around him. Often his leashed sentences would have a much more telling effect than any outburst would have. To those who worked with him, learnt the value of honing and chipping a news report into a missile. The professional that he was, SP Singh would stress that what mattered in the end was how you told the story.

Over the past two years, memories of SP Singh have come and gone, often at the most unexpected moments. Sometimes while driving, or when on a touring to an area that he had described, trying to make sense of what the fragmented Mandal family was up to or even remembrance of a tale that he had related triggered by an odd word or gesture.

To many of those who worked with him, SP Singh was a oasis where one could put down for a while professional and personal worries. He keenly understood people, in fact this was his passion, never cloistered, he loved meeting people and talking about a range of subjects. It was always a bit of a surprise to see the erudition that he could drum up. His knack for dealing with people saw him recognize when a colleague needed a leg up. In his own quiet as SP Singh would help restore confidence in a junior who could be finding the going tough. In a similar fashion, he could turn an inquiring mind onto a profitable path.

Every now and then, he would use humour to gently correct a colleague who could be getting his news copy just a bit wrong. Efforts of SP Singh’s friends to put together a more concrete manner of commemoration such as an annual lecture or seminars is most welcome. It could be a small way to return the bounty that he gave those who lives he touched.

Rajiv Deshpande


Published in Pioneer  

Friday, October 28, 2011

खबरें आपके इंतजार में हैं एसपी….


इंतजार में हैं एसपी ……
------निरंजन परिहार-----
एसपी सिंह
वह शुक्रवार था। काला शुक्रवार। इतना काला कि वह काल बनकर आया। और हमारे एसपी को लील गया। 27 जून 1997 को भारतीय मीडिया के इतिहास में सबसे दारुण और दर्दनाक दिन कहा जा सकता है। उस दिन से आज तक पूरे चौदह साल हो गए। एसपी सिंह हमारे बीच में नहीं है। ऐसा बहुत लोग मानते हैं। लेकिन अपन नहीं मानते। वे जिंदा है, आप में, हम में, और उन सब में, जो खबरों को खबरों की तरह नहीं, जिंदगी की तरह जीते हैं। यह हमको एसपी ने सिखाया। वे सिखा ही रहे थे कि..... चले गए।
एसपी। जी हां, एसपी। गाजीपुर गांव के सुरेंद्र प्रताप सिंह को इतने बड़े संसार में इतने छोटे नाम से ही यह देश जानता हैं। वह आज ही का दिन था, जब टेलीविजन पर खबरों का एकदम नया और गजब का संसार रचनेवाला एक सख्स हमारे बीच से सदा के लिए चला गया। तब दूरदर्शन ही था। जिसे पूरे देश में समैन रूप से सनातन सम्मान के साथ स्वीकार किया जाता था। देश के इस राष्ट्रीय टेलीविजन के मेट्रो चैनल की इज्ज्त एसपी की वजह से बढ़ी। क्योंकि वे उस पर रोज रात दस बजे खबरें लेकर आते थे। पर, टेलीविजन के परदे से पार झांकता, खबरों को जीता, दृश्यों को बोलता और शब्दों को तोलता वह समाचार पुरुष खबरों की दुनिया में जो काम कर गया, वह आजतककोई और नहीं कर पाया। 27 जून, 1997 को दूरदर्शन के दोपहर के बुलेटिन पर खबर आई – ‘एसपी सिंह नहीं रहे।और दुनिया भर को दुनिया भर की खबरें देनेवाला एक आदमी एक झटके में खुद खबर बन कर रह गया। मगर, यह खबर नहीं थी। एक वार था, जो देश और दुनिया के लाखों दिलों पर बहुत गहरे असर कर गया। रात के दस बजते ही पूरे देश को जिस खिचड़ी दढ़ियल चेहरे के शख्स से खबरें देखने की आदत हो गई थी। वह शख्स चला गया। देश के लाखों लोगों के साथ अपने लिए भी वह सन्न कर देनेवाला प्रहार था।
अपने जीवन के आखरी न्यूज बुलेटिन में बाकी बहुत सारी बातों के अलावा एसपी ने तनिक व्यंग्य में कहा था – ‘मगर जिंदगी तो अपनी रफ्तार से चलती रहती है।टेलीविजन पर यह एसपी के आखरी शब्द थे। एसपी ने यह व्यंग्य उस तंत्र पर किया था, जो मानवीय संवेदनाओं को ताक में रखकर जिंदगी को सिर्फ नफे और नुकसान के तराजू में तोलता है। उस रात का वह व्यंग्य एसपी के लिए विड़ंबना बुनते हुए आया, और उन्हें लील गया। इतने सालों बाद भी अपना एसपी से एक सवाल जिंदा है, और वह यही है कि - खबरें तो अभी और भी थीं एसपी... और जिंदगी भी अपनी रफ्तार से चलती ही रहती, पर आप क्यों चले गए। इतने सालों बाद आज भी हमको लगता है, कि न्यूज टेलीविजन और एसपी, दोनों पर्याय बन गए थे एक दूसरे का। आजतकको जन्म देने, उसे बनाने, सजाने संवारने और दृश्य खबरों के संसार में नई क्रांति लाकर खबरों के संसार में नंबर वन बन बैठे एसपी ने आजतकको ही अपना पूरा जीवन भी दान कर दिया। जीना मरना तो खैर अपने हाथ में नहीं है, यह अपन जानते हैं। मगर फिर भी, यह कहते हैं कि एसपी अगर आजतकमें नहीं होते, तो शायद कुछ दिन और जी लेते।
एसपी सिंह की पुण्यतिथि 27 जून पर विशेषवह बॉर्डरथी, जो एसपी की जिंदगी की भी बॉर्डरबन आई थी। सनी देओल के बेहतरीन अभिनय वाली यह फिल्म देखने के लिए दिल्ली के उपहारसिनेमा में उस दिन बहुत सारे बच्चे आए थे। वहां भीषण आग लग गई और कई सारे बच्चों के लिए वह सिनेमाघर मौत का उपहारबन गया। बाकी लोगों के लिए यह सिर्फ एक खबर थी। मगर बेहद संवेदनशील और मानवीयता से भरे मन वाले एसपी के लिए यह जीवन का सच थी। जब बाकी बुलेटिन देश और दुनिया की बहुत सारी अलग अलग किस्म की खबरें परोस रहे थे, तो उस शनिवार के पूरे बुलेटिन को एसपी ने बॉर्डरऔर उपहारको ही सादर समर्पित कर दिया। टेलीविजन पर खबर परोसने में यह एसपी का अपना विजन था। शनिवार सुबह से ही अपनी पूरी टीम को लगा दिया। और शाम तक जो कुछ तैयार हुआ, उस बुलेटिन को अगर थोड़ा तार तार करके देखें, तो उसमें एसपी का एक पूरा रचना संसार था। जिसमें मानवीय संवेदनाओं को झकझोरते दृश्यों वाली खबरों को एसपी ने जिस भावुक अंदाज में पेश किया था, उसे इतने सालों बाद भी यह देश भूला नहीं है। दरअसल, वह न्यूज बुलेटिन नहीं था। वह कला और आग के बीच पिसती मानवीयता के बावजूद क्रूर अट्टहास करती बेपरवाह सरकारी मशीनरी और रुपयों की थैली भरनेवाले सिनेमाघरों के स्वार्थ की सच्चाई का दस्तावेज था। एसपी ने उस रात के अपने इस न्यूज बुलेटिन में इसी सच्चाई को तार तार किया, जार जार किया और बुलेटिन जैसे ही तैयार हुआ, एसपी ने बार बार देखा। फिर धार धार रोए। जो लोग एसपी को नजदीक से जानते थे, वे जानते थे कि एसपी बहुत संवेदनशील हैं, मगर इतने...?
दरअसल, एसपी के दिमाग की नस फट गई थी। जिन लोगों ने शुक्रवार के दिन बॉर्डरदेखने उपहारमें आए बच्चों की मौत के मातम भरे मंजर को समर्पित शनिवार के उस आजतक को देखा है, उन्होंने चौदह साल बाद भी आजतक उस जैसा कोई भी न्यूज बुलेटिन नहीं देखा होगा, यह अपना दावा है। और यह भी लगता है कि हृदय विदारक शब्द भी असल में उसी न्यूज बुलेटिन के लिए बना होगा। एसपी की पूरी टीम ने जो खबरें बुनीं, एसपी ने उन्हें करीने से संवारा। मुंबई से खास तौर से बॉर्डरके गीत मंगाए। उन्हें भी उस बुलेटिन में एसपी ने भरा। धू धू करती आग, जलते मासूम, बिलखते बच्चे, रोते परिजन, कराहते घायल, सम्हालते सैनिक, और मौन मूक प्रशासन को परदे पर लाकर पार्श्व में संदेसे आते हैं...की धुन एसपी ने इस तरह सजाई गई कि क्रूर से क्रूर मन को भी अंदर तक झकझोर दे। तो फिर एसपी तो भीतर तक बहुत संवेदनशील थे। कोई बात दिमाग में अटक गई। यह न्यूज बुलेटिन नहीं, आधे घंटे की पूरी डॉक्यूमेंट्री थी। और यही डॉक्यूमेंट्रीनुमा न्यूज बुलेटिन एसपी के दिमाग की नस को फाड़ने में कामयाब हो गया।
जिंदगी से लड़ने का जोरदार जज्बा रखनेवाले एसपी अस्पताल में पूरे तेरह दिन तक उससे जूझते रहे। मगर जिंदगी की जंग में आखिर हार गए। सरकारी तंत्र की उलझनभरी गलियों में अपने स्वार्थ की तलाश करनेवालों का असली चेहरा दुनिया के सामने पेश करनेवाले अपने आखरी न्यूज बुलेटिन के बाद एसपी भी आखिर थक गए। बुलेटिन देखकर अपने दिमाग की नस फड़वाने के बाद तेरह दिन आराम किया और फिर विदाई ले ली। पहले राजनीति की फिर पत्रकारिता में आए एसपी ने 3 दिसंबर 1948 को जन्मने के बाद गाजीपुर में चौथी तक पढ़ाई की। फिर कलकत्ता में रहे। 1964 में बीए के बाद राजनीति में आए, पर खुद को खपा नहीं पाए। सो, 1970 में कलकत्ता में खुद के नामवाले सुरेंद्र नाथ कॉलेज में लेक्चररी भी की। पर, मामला जमा नहीं। दो साल बाद ही धर्मयुगप्रशिक्षु उप संपादक का काम शुरू किया। फिर तो, रुके ही नहीं। रविवार, नवभारत टाइम्स और टेलीग्राफ होते हुए टीवी टुडे आए। और यहीं आधे घंटे का न्यूज बुलेटिन शुरू करने का पराक्रम किया, जो उनसे पहले इस देश में और कोई नहीं कर पाया। वे कालजयी हो गए। कालजयी इसलिए, क्योंकि दृश्य खबरों के संसार का जो ताना बाना उनने इस देश में बुना, उनसे पहले और उनके बाद और कोई नहीं बुन पाया।
टेलीविजन खबरों के पेश करने का अंदाज बदलकर एसपी ने देश को एक आदत सी डाल दी थी। आदत से मजबूर उन लोगों में अपने जैसे करोड़ों लोग और भी थे। लेकिन मीडिया में अपन खुद को खुशनसीब इसलिए मानते हैं, क्योंकि अपन एसपी के साथ जब काम कर रहे थे, तो उनके चहेते हुआ करते थे। अपन इसे अपने लिए गौरव मानते रहे हैं। एसपी जब टेलीविजन के काम में बहुत गहरे तक डूब गए थे, तो उनने एक बार अपन से कहा था जो वे अकसर कईयों को कहा करते थे – ‘यह जो टेलीविजन है ना, प्रिंट मीडिया के मुकाबले आपको जितना देता है, उसके मुकाबले आपसे कई गुना ज्यादा वसूलता है।एसपी ने बिल्कुल सही कहा था। टेलीविजन ने एसपी को शोहरत और शाबासी बख्शी, तो उसकी कीमत भी वसूली। और, यह कीमत एसपी को अपनी जिंदगी देकर चुकानी पड़ी। मगर आपने तो आखरी बार भी यही कहा था एसपी कि - जिंदगी तो अपनी रफ्तार से चलती रहती है।पर, जिंदगी तो थम गई। मगर खबरें अभी और भी हैं जो आज भी खबर हो जाने के लिए एसपी का इंतजार कर रही हैं|
(माझे फेसबुक मित्र श्री दिलीप मंडल यांच्या वॉलवरून साभार
मेरे फेसबुक मित्र श्री दिलीप मंडल साहब की वॉल से साभार ..)
संकलनः- वैभव छाया  

Thursday, October 27, 2011

सचमुच ही मीडिया के महानायक थे एसपी सिंह



राजेश त्रिपाठी
मुझ जैसे कई पत्रकारों को हिंदी साप्ताहिक 'रविवार' में 10 साल तक एसपी के साथ काम करने और सार्थक पत्रकारिता से जुड़ने का अवसर मिला। हमने उस व्यक्तित्व को समीप से जाना-पहचाना जो साहसी व सुलझा हुआ था और जिसे खबरों की सटीक और अच्छी पहचान थी। सामाजिक सरोकार की पत्रकारिता की उन्होंने जो शुरुआत इस साप्ताहिक से की, वह पूरे देश में प्रशंसित-स्वीकृत हुई। यह उनकी सशक्त पत्रकारिता का ही परिणाम था कि 'रविवार' ने सत्ता के उच्च शिखरों तक से टकराने में हिचकिचाहट न दिखायी।
इसके चलते 'रविवार' के खिलाफ कोई न कोई मामला दर्ज होता ही रहता था। लेकिन विश्ववसनीयता इतनी थी कि विधानसभाओं तक में इसके अंक प्रमाण के तौर पर लहराए जाते थे। खबरों की उनकी पकड़ का एक प्रमाण भागलपुर आंखफोड़ कांड की घटना से समझा जा सकता है। यह खबर 'आर्यावर्त' के भीतरी पृष्ठ पर इस तरह से उपेक्षित ढंग से छपी थी कि कहीं किसी की नजर न पड़ सके। एसपी को यह बहुत खराब लगा। पत्रकार धर्म की यह उदासीनता उन्हें भीतर तक कचोट गई। उन्होंने हमारे एक साथी अनिल ठाकुर को (जो भागलपुर के ही रहने वाले हैं) तत्काल भागलपुर भेजा और भागलपुर आंखफोड़ कांड का काला अध्याय 'रविवार' की आमुख कथा बना। जैसा स्वाभाविक है, तहलका मच गया। इसके बाद अंग्रेजी पत्र-पत्रिकाओं ने भी इसे प्रमुखता से छापा। अफसोस इस बात का है कि अंग्रेजी पत्र-पत्रिकाओं को तो इस पर पुरस्कार मिले लेकिन 'रविवार' जिसने इस स्टोरी को प्रमुखता से ब्रेक किया, के हिस्से सिर्फ पाठकों और चहानेवालों की शुभकामनाएं ही आईं। यहां कहना पड़ता है कि अगर हिंदी अब भी दासी है तो इसके दोषी शायद हम हिंदीभाषी या कहें हिंदीप्रेमी भी हैं।

मैंने जिक्र किया कि 'रविवार' व्यवस्था विरोधी (सारी व्यवस्था नहीं, वह जो भ्रष्टाचार में आकंठ डूबी हो) पत्र था इसलिए मामले उस पर होते ही रहते थे। इसी तरह का एक प्रसंग याद आता है। हम सभी आनंद बाजार प्रकाशन समूह के प्रफुल्ल सरकार स्ट्रीट स्थित कार्यालय में काम कर रहे थे। एसपी अपने चेंबर में थे। अचानक कुछ पुलिस अधिकारी उनसे मिलने आए। स्थानीय पुलिस अधिकारी अक्सर उनसे मिलने आते रहते थे। हम लोगों ने सोचा, वैसे ही कोई अधिकारी होंगे। कार्य में व्यस्त रहने के कारण हम लोग उनका परिचय नहीं पूछ सके और उनको एसपी के चेंबर में जाने दिया। थोड़ी देर में एसपी चेंबर से उन लोगों के साथ निकले और बोले-'अरे, भइया जरा पूछ लिया करो कि कौन हैं, कहां से हैं, ये मध्य प्रदेश पुलिस के अधिकारी हैं। मैं गिरफ्तार हो चुका हूं और अब जमानत लेने जा रहा हूं।' हमें याद आया कि मध्य प्रदेश विधानसभा के तत्कालीन अध्यक्ष पर एक स्टोरी 'रविवार' में छपी थी और उन्होंने मामला कर दिया था। उसके बाद से एसपी ने अग्रिम जमानत ही ले रखी थी।
सहजता तो जैसे उनका अभिन्न अंग था। 'रविवार' ज्वाइन करने के बाद मैं उनके गृहनगर श्यामनगर के पास गारुलिया गया तो पाया वे चंदन प्रताप सिंह को दुलार रहे हैं। चंदन तब छोटे थे। थोड़ी देर तक उनसे बातें होती रहीं फिर बोले- 'चलो भइया, तुमको फुटबाल दिखाते हैं।' हमने समझा कि कहीं फुटबाल मैच हो रहा होगा, उसे दिखाने ले जा रहे हैं। लेकिन यह क्या? गारुलिया में हुगली के तट पर बरसात के उस मौसम में कीचड़ से भरे एक मैदान में एसपी दा अपने बड़े भाई नरेंद्र प्रताप सिंह व अन्य लोगों के साथ फुटबाल खेलने उतर गए। कुछ देर बाद कीचड़ से वे इचने लथपथ हो गए कि उनको पहचान पाना मुश्किल हो रहा था। उनमें बाल सुलभ सहजता और सरलता थी। बहुत कुछ कहती थी हलकी दाढ़ी वाले रोबीले चेहरे पर चमकती उनकी भावभरी आंखें।
जो भी उनके साथ काम कर चुका है, उनके खुलेपन और अपने सहकर्मियों के प्रति भ्रातृवत व्यवहार को आजीवन याद रखेगा। कभी भी उन्हें किसी सहकर्मी से ऊंची आवाज में बात करते नहीं देखा। कुछ गलती होती तो सहजता से समझाते और कहते-आप अपना लिखा किसी और से भी चेक करा लिया करें। अपने साथी गलती पकड़ेंगे तो उसमें शर्म की कोई बात नहीं। अगर गलती छूट गयी तो कल लाखों लोगों के सामने शर्मशार होना पड़ेगा और जवाबदेह होना पड़ेगा। एक बार की बात है। हम लोग कुछ खाली थे और कार्यालय में रवीन्द्र कालिया जी का उपन्यास 'काला रजिस्टर' पढ़ रहे थे। उन्होंने देखा तो कहा- 'भइया, ऐसे मजा नहीं आएगा। आओ मैं इस उपन्यास के पात्रों का परिचय दे दूं। कालिया जी ने हम लोगों के साथ रहते हुए ही इसे लिखा है और हमें जितना लिखते जाते, सुनाते भी जाते थे। अच्छा है मजा आयेगा।'
एसपी पर जितना भी लिखा जाए, कम है। 10 साल की स्मृतियां कम शब्दों में तो सिमट नहीं सकतीं लेकिन दो एक प्रसंग जो उनके संवेदनशील मन को उजागर करते हैं और जिनसे उनका हिंदी प्रेम झलकता है, वह देना आवश्यक समझता हूं। उनकी पत्रकारिता 'न दैन्यम् न पलायनम्' की पक्षधर थी। उन्होंने सच को सच की तरह ही उजागर किया। पत्रकारिता में सुदामा वृत्ति उन्हें पसंद नहीं थी। उनका मानना था कि हिंदी अपने आप में सक्षम और सशक्त भाषा है और हिंदी पत्रकारिता को अंग्रेजी की बैसाखी की कोई आवश्यकता नहीं है। यही वजह है कि आनंद बाजार प्रकाशन समूह के 'रविवार' के बाद एसपी को जब दिल्ली के एक राष्ट्रीय पत्र में जुड़ने का प्रस्ताव आया और बताया गया कि अंग्रेजी अखबार का अनुवाद ही हिंदी अखबार में दिया जाए तो उन्होंने वहां से हटना ही श्रेयस्कर समझा। उसके बाद वे दिल्ली में 'द टेलीग्राफ' के राजनीतिक संपादक और फिर हिंदी के पहले निजी समाचार चैनल 'आज तक' के रूपकारों में रहे।
संवेदनशील इतने थे कि लोगों के दर्द को अपना दर्द समझते थे और उसे शिद्दत से महसूस भी करते थे। मेरे खयाल से यह अत्यंत संवेदनशीलता ही उनके असमय निधन का कारण बनी। दिल्ली के 'उपहार' सिनेमा के अग्निकांड में मृत लोगों के परिजनों का दर्द उन्होंने अपनी आंखों से देखा और दिल की गहराइयों से झेला। शनिवार को यह कार्यक्रम 'आज तक' में पेश करते वक्त उनकी आंखें नम थीं। वे कह गये 'ये थीं खबरें आज तक। इंतजार कीजिए सोमवार तक।' फिर वह सोमवार कभी नहीं आया। रविवार के दिन वे मस्तिष्काघात से संज्ञाशून्य हुए और फिर उन्हें बचाया नहीं जा सका। वैसे, एसपी जैसे व्यक्तित्व मरा नहीं करते। वे अपने कार्य से जीवित रहते हैं। भौतिक रूप से वे भले न हों लेकिन जब तक विश्व में सार्थक, सामाजिक सरोकार से जुड़ी पत्रकारिता है एसपी जीवित रहेंगे। लोगों के विचारों, कार्यों में एक सशक्त प्रेरणास्रोत के रूप में जीवित रहेंगे। मेरा उस महान आत्मा को शत-शत नमन।


(लेखक राजेश त्रिपाठी कोलकाता के वरिष्ठ पत्रकार हैं। वे तीन दशक से अधिक समय से पत्रकारिता में सक्रिय हैं। कोलकाता के लायंस क्लब की ओर से 'श्रेष्ठ पत्रकार', कटक (उड़ीसा) की लालालाजपत राय विचार मंच संस्था से 'श्रेष्ठ हिंदी पत्रकार' के रूप में सम्मानित हो चुके हैं। व्रिक्रमशिला विद्यापीठ भागलपुर (बिहार) से विद्या वाचस्पति की मानद उपाधि। अनेक बाल उपन्यास, उपन्यास, कहानियां, कविताएं पत्र-पत्रकाओं में प्रकाशित। साहित्य अकादमी की 'हूज हू आफ इडियन राइटर्स' में परिचय प्रकाशित। रविवार, जनसत्ता, प्रभातखबर डाट काम में कार्य करने के बाद संप्रति हिंदी दैनिक सन्मार्ग, कोलकाता से संबद्ध। राजेश से संपर्क rajeshtripathi@sify.com के जरिए किया जा सकता है)

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons